विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा, पावसामुळे अकरावी प्रवेशांसाठी मुदतवाढ

शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शुक्रवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच थेट परिणाम अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवरही पडला आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारने अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवली.

विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा, पावसामुळे अकरावी प्रवेशांसाठी मुदतवाढ
Follow us
| Updated on: Aug 03, 2019 | 9:22 PM

मुंबई : शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शुक्रवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच थेट परिणाम अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवरही पडला आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारने अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवली. शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी या निर्णयाची घोषणा केली.

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी 5 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत एक दिवसाने वाढवून 6 ऑगस्ट करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरु असेल. पावसाचा जोर लक्षात घेऊन शिक्षणमंत्री  आशिष शेलार यांनी तातडीने ट्विट करून ही मुदतवाढ जाहीर केली. तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरही यासंदर्भातील सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी घाई करुन पावसात बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये 5 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. शुक्रवारपासून (2 ऑगस्ट) सुरु झालेल्या पावसाने एक दिवस वाया जाऊ नये म्हणून पालक घाई करण्याची शक्यता होती. सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयात पोहचणे अशक्य झाले.

या पार्श्ववभूमीवर प्रवेशासाठी जोखीम घेण्याची वेळ येऊ नये म्हणून शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश दिले. आता ही मुदत एका दिवसाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वाढलेल्या मुदतीनुसार विद्यार्थी 6 ऑगस्टपर्यंत शुल्क आणि कागदपत्रे सादर करुन आपले प्रवेश निश्चित करु शकणार आहेत.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.