वायूसेना आता आणखी शक्तीशाली होणार, केंद्र सरकार 200 लढाऊ विमानं खरेदी करणार

भारतीय वायूसेनेतील विमानांची संख्या कमी होत असल्यामुळे केंद्र सरकार 200 विमानं खरेदी (Central government buy aircraft) करणार आहेत.

वायूसेना आता आणखी शक्तीशाली होणार, केंद्र सरकार 200 लढाऊ विमानं खरेदी करणार
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 9:10 AM

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेतील विमानांची संख्या कमी होत असल्यामुळे केंद्र सरकार 200 विमानं खरेदी (Central government buy aircraft) करणार आहेत. “लवकरच वायूसेनेला 200 लढाऊ विमानं मिळणार आहेत. तसेच लढाऊ विमानांमध्ये वाढ करण्यासाठी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत करार सुरु आहे”, अशी माहिती संरक्षण सचिव अजय कुमार यांनी (Central government buy aircraft) दिली.

“एचएएल कंपनी 83 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मार्क 1 तयार करणार आहेत. या 83 विमानांशिवाय इतर 110 विमानांचे प्रस्ताव मागवले आहेत. अशाप्रकारे 200 लढाऊ विमानं खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे”, असं अजय कुमार यांनी सांगितले.

“विमानं लवकरात लवकर तयार करण्यासाठी यावर्षी एचएएलसोबत करार करण्यात येणार आहे. पहिले लढाऊ विमांनाचे डिझाईन फायनल केले जाईल. यानंतर 8 ते 10 एअरक्राफ्ट तयार करण्यात येणार आहेत”, असंही अजय कुमार यांनी सांगितले.

“जर आपल्याला आऊटसोर्सिंगची गरज पडली तर आपण यापेक्षाही पुढे जाऊ. सध्या भारताच्या वायूसेनेकडे मिराज 2000, 30 सुखोई, मिग 29, जॅग्वॉर आणि मिग 21 बायसन लढाऊ विमानं आहेत”, असंही अजय कुमार म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.