अटल बिहारी वाजपेयींचा स्मृती दिन, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज प्रथम पुण्यातिथी आहे. अटल स्मृती दिनानिमित्त राजधानी दिल्लीत देशातील दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज प्रथम पुण्यातिथी आहे. अटल स्मृती दिनानिमित्त राजधानी दिल्लीत देशातील दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह यांनी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं.
गेल्या वर्षी म्हणजेच 16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयींचं दीर्घ आजाराने निधन झालं होतं.
Delhi: Union Home Minister Amit Shah, BJP national working president JP Nadda and other leaders of the party pay tribute to former PM #AtalBihariVajpayee at ‘Sadaiv Atal’ on his first death anniversary today. pic.twitter.com/h1Tyzx0y0C
— ANI (@ANI) August 16, 2019
वाजपेयींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्थळा वंदन करण्यासाठी त्यांची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिका यांच्यासह मित्र परिवारातील दिग्गजांनी हजेरी लावली.
Delhi: Late #AtalBihariVajpayee‘s daughter Namita Kaul Bhattacharya and granddaughter Niharika arrive at ‘Sadaiv Atal’, on the former Prime Minister’s first death anniversary today. pic.twitter.com/6WU2SfPkmF
— ANI (@ANI) August 16, 2019
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरुन वाजपेयींना श्रद्धांजली दिली.
अटल जी भारतीय लोकतंत्र की उत्कृष्टतम परंपराओं के प्रेरणा पुंज थे, लोकतंत्र की सात्विक मर्यादाओं के मूर्तरूप थे। देश अपने मानवतावादी युगदृष्टा नेता, सहृदय और ओजस्वी शब्दशिल्पी को कृतज्ञतापूर्वक स्मरण करता रहेगा। पुण्यात्मा को मेरी विनम्र श्रद्धांजलि। pic.twitter.com/F5hC0frlag
— VicePresidentOfIndia (@VPSecretariat) August 16, 2019
मोदी सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ने गौरवलं होतं. वाजपेयी 1996 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते. त्यावेळी केवळ 13 दिवसात त्यांचं सरकार कोसळलं होतं. मग 1998 मध्ये वाजपेयी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यावेळीही त्यांचं सरकार 13 महिनेच चालले. 1999 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या वाजपेयींनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. वाजपेयी 2004 पासून प्रकृती अस्वास्थामुळे राजकारणापासून दूर होते.