मुलगा, मुलगी भेद करणाऱ्यांना सणसणीत चपराक! मुलगा नसलेल्या वडिलांना मुलींचेच खांदा देत अंत्यसंस्कार
आलटून पालटून तिन्ही मुलींकडे हे दाम्पत्य वास्तव्य करून आपलं आयुष्य जगत होते. वार्धक्याने गणपत भोईर यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले.
भिवंडी : भिवंडीत (Bhiwandi) मुलगा नसणाऱ्या वृद्धाचे मुलींनी खांदा देत अंत्यसंस्कार केले आहेत. या घटनेनं मुलगा, मुलगी असा भेद करणाऱ्यांना या घटनेनं सणसणीत चपराक बसली आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मुलगी म्हणजे परक्याचे धन या म्हणीप्रमाणे समाज आजही वावरताना दिसतो. अशातच भिवंडीत मुलगा नसलेल्या गणपत कृष्णा भोईर (Ganpat Krishna Bhoir) या 87 वर्षीय वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिन्ही मुली पुढे सरसावल्यात. सरसावत त्यांनी मृतदेहाच्या तिरडीला खांदा देत अंत्यसंस्कार केले आहेत. भिवंडी शहरातील नारपोली (Narpoli, Bhiwandi) या भागात राहणारे गणपत कृष्णा भोईर आणि विठाबाई गणपत भोईर या दाम्पत्यास एक मुलगा तर तीन मुली असा परिवार होता. परंतु डोक्यात ताप शिरल्याने मुलगा गणेश वेडसर होऊन वयाच्या 25 व्या वर्षी त्याचे निधन झालं होतं. तेव्हा पासून काबाडकष्ट करणाऱ्या गणपत भोईर यांनी सुषमा, सुलोचना आणि शिल्पा या तिन्ही मुलींना लहानाचं मोठं केलं. त्यांचा विवाह लावून दिला होता.
मुलगा तारुण्यातच गमावला, पण…
दरम्यान, वय वाढत गेले तसे कष्ट झेपत नसल्याने वार्धक्यात घरीच असलेल्या आईवडिलांचा सांभाळ तिन्ही मुली करीत होत्या. आलटून पालटून तिन्ही मुलींकडे हे दाम्पत्य वास्तव्य करून आपलं आयुष्य जगत होते. वार्धक्याने गणपत भोईर यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. गणपत काका म्हणून ओळखले जाणारे गणपत भोईर यांनी आपल्या हयातीत अनेकांचे संसार उभे करण्यसाठी काम केलं. परंतु त्यांच्या वृद्धपकाळात गरिबीमुळे सख्या नात्यातील अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती.
पाहा अंत्यसंस्काराचा व्हिडीओ –
भिवंडीतील तीन मुलींनी आपल्या वडिलांसाठी जे पाऊल उचललं ते फक्त कौतुकास्पदच नाही, तर मुलगा मुलगी भेद करणाऱ्यांना मिळालेली सणसणीत चपराक आहे! – व्हिडीओ – गिरीश गायकवाड pic.twitter.com/S4u79ZjGwJ
— Siddhesh Sawant (@ssidsawant) January 31, 2022
अखेर मुलींनीचं आपल्या जन्मदात्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मुलींनी तिरडीला खांदा देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत. सुलोचना, शिल्पा यांनी तिरडीला खांदा दिला तर मोठी मुलगी सुषमाने तिरडी समोर शिदोरी धरत स्मशानभूमीत मृतदेहास अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यावेळी उपस्थित सर्वजण भारावले होते.
आणि उपस्थितांचे डोळे पाणावले!
मुलींच्या या धाडसी निर्णयाचं उपस्थितांनी स्वागत करत मुलगा मुलगी हा भेद मानणाऱ्या आणि स्वार्थासाठी नाती जोपासणाऱ्या समाजाला चपराक लगावली, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. या मुलींनी ही कृती करूनच इथवरच न थांबता आता वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या वृद्ध आईचा सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कार प्रसंगी घेतली. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले.
संबंधित बातम्या :
दिल्लीतून पळाली, पालघरात मिळाली! सजग रिक्षाचालकामुळं लेक सापडली
पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप