नाशिक येथील कादवा नदीत बुडून तिघांचा मृत्यू

दिंडोरी येथे कादवा नदीत आज (9 जून) सकाळी अकराच्या दरम्यान तीन जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना ओझे गावातील कादवा नदी येथे घडली.

नाशिक येथील कादवा नदीत बुडून तिघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 09, 2019 | 11:08 PM

नाशिक : दिंडोरी येथे कादवा नदीत आज (9 जून) सकाळी अकराच्या दरम्यान तीन जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना ओझे गावातील कादवा नदी येथे घडली. अनिता वाघमारे (29), मुलगा ओकांर वाघमारे (14) आणि प्राजक्ता बाळू गांगोडे (15) अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. कादवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना ही दुर्देवी घटना घडली.

कादवा नदी पात्रात नुकतेच करंजवण धरणातून पाणी सोडल्यामुळे ओझे गावाजवळ पाण्याची पातळी वाढली. यावेळी कपडे धूत असताना तोल जाऊन पडल्याने तिघेही कादवा नदी पात्रात बुडाले. मात्र निर्जन भाग असल्यामुळे ही बाब कोणाच्याही लवकर लक्षात आली नाही. परंतु नदीपात्राच्या जवळून जात असलेल्या एका भंगारवाल्याच्या लक्षात आल्याने त्याने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत कादवा नदी पात्रात शोध कार्य सुरु केले.

शोध कार्य सुरु असताना पहिले अनिता वाघमारे यांचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर दुपारी प्राजक्ता गांगोडेचा मृतदेह सापडला. तर सायंकाळी ओंकार वाघमारेचा मृतदेह हाती लागला. तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने ओझे आणि उमराळे गावावर शोककळा पसरली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.