लॉकडाऊनमध्ये मजूर, बेघर आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांना नागपूर महानगरपालिकेच्या निवारा केंद्राचा मोठा आधार मिळत (Beggar make over nagpur)आहे.
महानगरपालिकेचे निवारा केंद्र हे बेघर, गरिबांसाठी मेक ओव्हरचे केंद्र बनले आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून हे निवारा केंद्र तयार करण्यात आले आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेच्या काळजीसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
नागपूर शहरातील रस्ते, फुटपाथावर राहणाऱ्या बेघरांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, नागपूर महानगरपालिकेद्वारे लॉकडाऊनचा अभिनव फायदा करून घेतला जात आहे.
शहरातील विविध भागातील 20 बेघर निवाऱ्यात 1252 जणांनी आसरा घेतला आहे.
या सर्वांना मनपातर्फे चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या संपूर्ण भोजनाचीही मोफत सोय केली जात आहे.
पहिल्यांदा निवारा केंद्रातबेघरांचे केश कापणे, त्यांना रोज आंघोळ करून स्वच्छ नवीन कपडे वापरायला दिले जात आहेत.
नागपुरातील या निवारा केंद्राचे सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
तुकाराम मुंढेंच्या संकल्पनेमुळे गरिबांना आसरा मिळत आहे.
लॉकडाऊनमध्ये ही निवारा केंद्र गरिबांसाठी आधार केंद्र बनली आहेत.