राज्यात मोठं जलसंकट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

नागपूर : राज्यात भीषण टंचाईला सामोरे जात असलेल्या नागरिकांना अजुनही पावसाने दिलासा दिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या धरणांचा पाणीसाठी संपत आला आहे. जलसंपदा विभागाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये सरासरी केवळ  7 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. विभागनिहाय धरणांच्या जलसाठ्यांचा विचार केला तर औरंगाबाद विभागात भीषण परिस्थिती असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. औरंगाबादमधील धरणांमध्ये अवघा […]

राज्यात मोठं जलसंकट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
Follow us
| Updated on: Jun 04, 2019 | 9:36 AM

नागपूर : राज्यात भीषण टंचाईला सामोरे जात असलेल्या नागरिकांना अजुनही पावसाने दिलासा दिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या धरणांचा पाणीसाठी संपत आला आहे. जलसंपदा विभागाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये सरासरी केवळ  7 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

विभागनिहाय धरणांच्या जलसाठ्यांचा विचार केला तर औरंगाबाद विभागात भीषण परिस्थिती असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. औरंगाबादमधील धरणांमध्ये अवघा 0.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील 6 जिल्ह्याच्या धरणांमध्ये 6 टक्के, अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये 7 टक्के, नाशिक विभागातील धरणांमध्ये 6 टक्के तर पुणे विभागातील धरणांमध्ये 7 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सून लांबणीला पडल्यास या पाचही विभागात मोठं जलसंकट तयार होऊ शकतं. अशास्थितीत राज्यसरकार आणि प्रशासन यावर काय उपाययोजना करणार हा मोठा प्रश्न आहे. पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण या पातळीवर राज्यसरकार काम करत असल्याचा दावा नेहमीच करण्यात आला आहे. मात्र, ही स्थिती पाहता त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळत नाही.

कोकणात राज्यातील इतर विभागांपेक्षा वेगळी स्थिती आहे. कोकणाला आपल्या भौगोलिक स्थानाचाही फायदा होत आलेला आहे. यावर्षी कोकणात मुबलक पाणी शिल्लक असून येथील धरणांमध्ये 27 टक्के पाणीसाठी आहे. हा पाणीसाठा कोकणाला मान्सुनच्या आगमनापर्यंत पुरेसा आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणांमध्ये 10 टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाच्या या आकडेवारीने नक्कीच चिंता वाढवली वाढवली आहे. मान्सून राज्यात उशीरा दाखल झाल्यास जलसंकट उभं राहणार का असाही प्रश्न त्यामुळे पडत आहे?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.