राज्यात सहा हजार टँकर्सद्वारे जवळपास 16 हजार गावांना पाणी पुरवठा

मुंबई : राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 13 टक्के पाणी शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील 4 हजार 920 गावे आणि 10 हजार 506 वाड्यांमध्ये 6 हजार 209 टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याशिवाय राज्यातील शेळ्या-मेंढ्यांसह लहान जनावरांसाठी दीड हजार […]

राज्यात सहा हजार टँकर्सद्वारे जवळपास 16 हजार गावांना पाणी पुरवठा
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 8:27 PM

मुंबई : राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 13 टक्के पाणी शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील 4 हजार 920 गावे आणि 10 हजार 506 वाड्यांमध्ये 6 हजार 209 टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याशिवाय राज्यातील शेळ्या-मेंढ्यांसह लहान जनावरांसाठी दीड हजार चारा छावण्याही उभारण्यात आल्या आहेत.

तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी साडेचार हजार कोटींच्या मदतीचे वाटप करण्यासह विद्युत शुल्कात सवलत, शैक्षणिक शुल्क माफी, कर्जवसुलीस स्थगिती अशा सर्व उपाययोजनांना गती देण्यात आली आहे.

28 हजार 524 गावांमध्ये दुष्काळ घोषित

राज्य सरकारद्वारे 28 हजार 524 गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून त्यातील 17 हजार 985 गावांना दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरित 10 हजार 539 गावांना विविध सुविधा लागू करण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षीची लोकसंख्या व पशुधनाची संख्या विचारात घेऊन टँकरने गावागावात पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

टँकर मंजुरीचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांना आणि चारा छावणी मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याशिवाय मागणी होताच ताबडतोब टँकर व चारा छावणी मंजूर करण्यात येत आहे.

राज्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दीर्घ व अल्प स्वरुपाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा स्तरावर टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकाऱ्याचा नियंत्रणाखाली टंचाई नियंत्रण आणि समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

टँकर्सच्या दरात वाढ

टँकर्सच्या एक मेट्रीक टनाकरिता दुर्गम व अतिदुर्गम भागासाठी प्रति 4.30 कि.मी.प्रमाणे  प्रतिदिन 338 रुपये भाडे देण्यात येते. तर सर्वसाधारण भागासाठी प्रति 3.40 कि.मी प्रतिदिन 270 रुपये असे भाडे करण्यात आले आहे. टंचाई अंतर्गत निधी वितरित करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे आणि त्यांच्याकडून जिल्हापरिषदेकडे तसेच जिल्हा प्राधरणीकरणाकडे प्रदान करण्यात येणारा निधी पाणी पुरवठा विभागाकडून थेट वितरीत करण्यातबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

टँकरग्रस्त गावांचा आढावा घेणार

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई अंतर्गत तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना व नळ पाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या 10 टक्क्यांपर्यंतच्या जादा दराच्या निविदा स्वीकृतीचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयीन स्तरावरील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकाऱ्‍यांच्या पथकाकडून टँकरग्रस्त गावांचा आढावा घेण्यात येणार आहे.

दरदिवशी ग्रामीण भागासाठी 20 लीटर, मोठ्या जनावरांसाठी 35 लीटर, लहान जनावरांसाठी 10 लीटर आणि शेळ्या मेंढ्यांसाठी 3 लीटर पाणी पुरवठा टँकरद्वारे करण्यात येत आहे.

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीचे वाटप

दुष्काळातील बाधित शेतकऱ्यांना कृषीविषयक मदत वाटप करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मदतीपैकी 4562 कोटी 88 लाख रुपयांची मदत राज्याकडे वर्ग केली आहे. राज्य शासनाने 67 लाख 30 हजार 865 शेतकऱ्यांना आतापर्यंत 4508 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप केले आहे.

शेतकऱ्यांना चालू वीज बिलात सूट

शेतकऱ्यांना चालू वीज बिलात दिलेल्या 33.5 टक्के सुटीप्रमाणे 673 कोटी 41 लाखाची सवलत देण्यात आली आहे. राज्यातील थकीत विद्युत देयके न भरल्यामुळे बंद असलेल्या पाणी पुरवठा योजनांची विद्युत जोडणी पूर्ववत करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2018 ते जून 2019 अखेरची विद्युत देयके शासनाकडून भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. या विद्युत देयकांसाठी मार्च 2019 अखेरपर्यंत 132 कोटी 30 लाख इतका निधी खर्च झाला आहे.

दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा छावण्या

दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 1501 ठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 8 लाख 94 हजार 495 मोठी आणि 1 लाख 9 हजार 919 लहान अशी एकूण 10 लाख 4 हजार 684 जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून मोठ्या जनावरांना प्रतिदिन 100 रुपये तर लहान जनावरांना प्रतिदिन 50 रुपये देण्यात येतात. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चारा छावणी चालकांना मागणीप्रमाणे निधी वितरित करण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना 111 कोटी 87 लाख, पुणे विभागीय आयुक्तांना 3 कोटी 79 लाख आणि नाशिक विभागीय आयुक्तांना 46 कोटी 81 लाख निधी देण्यात आला आहे.

जलाशयांमध्ये 13 टक्के साठा

राज्यातील जलाशयात 27 मे 2019 अखेर 13.1 टक्के साठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच सुमारास 23.14 टक्के साठा होता. यानुसार कोकण विभागात 33.69 टक्के (39.71) सर्वाधिक जलसाठा उपलब्ध आहे. त्यानंतर पुणे विभागात 12.6 टक्के (25.05), नाशिक विभागात 13.29 टक्के (23.09), अमरावती विभागात 20.1 टक्के (18.87), नागपूर विभागात 8.85 टक्के (12.43) आणि औरंगाबाद विभागात 2.86 टक्के (20.46) इतका साठा उपलब्ध आहे.

राज्यात 6209 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा

राज्यात 27 मे 2019 अखेर एकूण 6209 टँकर्सद्वारे 4920 गावे आणि 10506 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद विभागातील सर्वाधिक 2286 गावे आणि 785 वाड्यांना 3233 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर नाशिक विभागात 1066 गावे आणि 4020 वाड्यांना 1377 टँकर्स, पुणे विभागात 853 गावे आणि 4958 वाड्यांना 1000 टँकर्स, अमरावती विभागात 401 गावांमध्ये 424 टँकर्स, कोकण विभागात 274 गावे आणि 743 वाड्यांना 125 टँकर्स आणि नागपूर विभागात 40 गावांना 50 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.