Skin | पावसाळ्यात तेलकट त्वचेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर!
फक्त उन्हाळ्याच्या हंगामातच त्वचेला सनस्क्रीन लावावे, असे अजिबात नाहीये. पावसाळ्याच्या हंगामात देखील त्वचेला सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. या ऋतूत तुम्ही हलके सनस्क्रीन वापरू शकता. तुम्ही जेल आधारित सनस्क्रीन वापरत असल तर वापरू नका, कारण यामुळे आपली त्वचा अधिक तेलकट होईल.
मुंबई : तेलकट त्वचा (Skin) असलेल्या लोकांना प्रत्येक हंगामामध्येच आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. विेशेष: पावसाळ्यामध्ये त्वचेच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. या ऋतूमध्ये त्वचेशी संबंधित समस्या जसे पिंपल्स आणि सुरकुत्यांची समस्या वाढते. बरेच लोक अनेक प्रकारचे सौंदर्य उत्पादने (Beauty products) वापरतात. या केमिकलयुक्त उत्पादनांचा त्वचेवर दीर्घकाळ खूप वाईट परिणाम होतो, पावसाळ्यात त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. यामुळे पावसाळ्यातही तुमची त्वचा निरोगी राहील, हे घरगुती उपाय (Home Remedies) नेमके कोणते आहेत, याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
एक्सफोलिएशन
एक्सफोलिएशन त्वचेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी एक्सफोलिएशन खूप महत्वाचे आहे. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा त्वचा एक्सफोलिएट करू शकता, यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे एक्सफोलिएशनमुळे तेलकट त्वचेची समस्या दूर होते.
मॉइश्चरायझर
बदलत्या ऋतूत योग्य मॉइश्चरायझर अत्यंत फायदेशीर ठरते. आपण त्वचेला दररोज मॉइश्चरायझर केले पाहिजे. पावसाळ्यात हलके मॉइश्चरायझर आणि जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता. आपण सॅलिसिलिक ऍसिडआणि हायलुरोनिक ऍसिडसह मॉइश्चरायझर वापरू शकता.
सनस्क्रीन
फक्त उन्हाळ्याच्या हंगामातच त्वचेला सनस्क्रीन लावावे, असे अजिबात नाहीये. पावसाळ्याच्या हंगामात देखील त्वचेला सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. या ऋतूत तुम्ही हलके सनस्क्रीन वापरू शकता. तुम्ही जेल आधारित सनस्क्रीन वापरत असल तर वापरू नका, कारण यामुळे आपली त्वचा अधिक तेलकट होईल.
हायड्रेटेड
पावसाळ्यात उष्णता आणि आर्द्रता वाढल्यामुळे तुम्हाला निर्जलीकरण जाणवते. ते तुमच्या त्वचेवरही दिसून येते. डिहायड्रेशनमुळे त्वचा खूप तेलकट राहते. अशा परिस्थितीत, हायड्रेटेड राहण्यासाठी आणि तेलकटपणाचा सामना करण्यासाठी पुरेसे पाणी प्या. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या.