महिलांना लग्नासाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे करण्याची मागणी

स्त्री आणि पुरुष यांना लग्नासाठी वेगवेगळी वयाची अट ठेवणं हा स्पष्ट भेदभाव असल्याचं सांगत भाजप नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे

महिलांना लग्नासाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे करण्याची मागणी
Follow us
| Updated on: Aug 20, 2019 | 8:25 AM

नवी दिल्ली : महिलांना लग्न करण्यासाठी असलेली किमान वयाची अट पुरुषांप्रमाणेच करावी (Same Legal Marriage Age), अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही 21 वर्षे ही लग्नासाठी किमान वयोमर्यादा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याचिकेला 30 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डीएन पटेल आणि जस्टीस सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला दिले आहेत. सध्या भारतात महिलांना वयाच्या अठराव्या वर्षी बोहल्यावर चढण्याची परवानगी आहे, तर पुरुषांना लग्नासाठी वयाची एकविशी गाठेपर्यंत थांबावं लागतं.

स्त्री आणि पुरुष यांना लग्नासाठी वेगवेगळी वयाची अट ठेवणं हा स्पष्ट भेदभाव असल्याचं भाजप नेते आणि याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी म्हटलं आहे. लग्नाच्या किमान वयातील फरक हा पुरुषप्रधान पूर्वग्रहांवर आधारित होता आणि त्याला वैज्ञानिक आधार नाही, असा दावाही उपाध्याय यांनी केला आहे.

या अटीमुळे लैंगिक समानता, लिंगाधारित न्याय आणि महिलांचा सन्मान या तत्त्वांचं उल्लंघन होत असल्याचंही उपाध्याय यांनी याचिकेत म्हटलं आहे. स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवून महिलांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावाच्या लज्जास्पद पद्धतीला याचिकेतून आव्हान देत आहे, असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

महिलांनी विवाहसंस्थेत गौण भूमिका साकारण्याची अपेक्षा असल्यामुळे असंतुलन आढळतं. तरुण जोडीदाराने वयाने मोठ्या जोडीदाराचा आदर करणे आणि त्याची सेवा करण्याची अपेक्षा केली आहे. त्यामुळे वैवाहिक संबंधांत लिंग-आधारित उतरंड दिसते, असंही उपाध्याय यांचं म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.