भांडण का केलं म्हणून तीन शिक्षकांकडून विद्यार्थाला मारहाण

अहमदनगर : आठवीत शिकणाऱ्या मुलाला तीन शिक्षकांनी बेदाम मारहाण केल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात काष्टीच्या जनता विद्यालयातील शिक्षकांचा अमानुषपणा समोर आला आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थाला या तीन शिक्षकांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. याप्रकरणी शाळा प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन शाळेच्या […]

भांडण का केलं म्हणून तीन शिक्षकांकडून विद्यार्थाला मारहाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

अहमदनगर : आठवीत शिकणाऱ्या मुलाला तीन शिक्षकांनी बेदाम मारहाण केल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात काष्टीच्या जनता विद्यालयातील शिक्षकांचा अमानुषपणा समोर आला आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थाला या तीन शिक्षकांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. याप्रकरणी शाळा प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलं. या मारकुट्या शिक्षकांविरोधात मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आठवीत शिकणारा चैतन्य माने या विद्यार्थ्याचं त्याच्याच वर्गातील काही मुलांबरोबर भांडण झालं. भांडण का केलं या कारणावरुन शाळेतील तीन शिक्षकांनी मिळून चैतन्यला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत चैतन्य गंभीर जखमी झाला आहे. यात चैतन्य अंगावर, पाठीवर जखम झाली आहे. ही शाळा रयत शिक्षण संस्थेची असून शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थाला मारहाण झाल्याची कबुली दिली आहे. तसेच संबंधित शिक्षकांचे अहवाल वरिष्ठांनकडे पाठवणार असल्याचंही मुख्याध्यापकांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणी मुलाची आई रुपाली बाळासाहेब माने यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलाला शिक्षकांनी शिवीगाळ करत निष्ठुरपणे मारहाण केल्याने संबंधितांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. शाळेच्या मधल्या सुट्टीत त्याचे वर्गातील एका मुलासोबत भांडण झाले होते त्याचा राग येवून शिक्षक एच.पी.शिंदे, वर्गशिक्षक खामकर आणि ढवळे या तिघांनी आपल्या मुलास बेदम मारहाण केल्याचं या तक्रारीत सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी संबंधित शिक्षकांची चौकशी केली असून शाळा प्रशासनाला प्रशासकीय पातळीवर कारवाईचा अहवाल पाठवणार आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.