आधी ठाकरे, मग पाटील आणि आता अंतुले; नवी मुंबई विमानतळ नामांतरात एमआयएमची उडी
नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेली असतानाच आता या वादात एमआयएमने उडी घेतली आहे. (aimim wants Navi Mumbai international airport to be named after a. r. antulay)
नवीमुंबई: नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेली असतानाच आता या वादात एमआयएमने उडी घेतली आहे. नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं नाव देण्याची मागणी एमआयएमने केली आहे. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद अधिकच पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (aimim wants Navi Mumbai international airport to be named after a. r. antulay)
एमआयएम विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हाजी शहानवाज खान यांनी ही मागणी केली आहे. खान यांनी आज नवी मुंबईतील विमानतळाला बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचे नाव देण्याची मागणी केली. खान यांनी सिडकोच्या वरिष्ठ परिवहन अभियंता गीता पिल्लई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणीचं निवेदनही सादर केलं. जास्त गर्दी न होता आम्ही शांततापूर्वक ही मागणी केली आहे. याबाबत लेखीपत्र सुद्धा सिडकोला दिले आहे. सर्वच पक्ष यात राजकारण करत असून आम्ही कुणाच्या भावना न दुखवता अंतुले यांचे नाव विमानतळाला द्यावे, अशी मागणी केली आहे, असं हाजी शहानवाज खान यांनी सांगितलं.
जातीय रंग देण्याचा प्रयत्न?
एमआयएमने अंतुले यांच्या नावाची मागणी करून या वादाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का? असा सवाल करण्यात आला असून हा जातीचा नाही तर मातीचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएमकडून व्यक्त करण्यात आली. या आधी शिवसेनेने नवी मुंबई विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. तर, भाजप नेते आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली होती.
ठाकूर काय म्हणाले?
नवी मुंबईतील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही. नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने सक्तीने जमिनी संपादित केल्या होत्या. भूमिपुत्रांना या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा म्हणून दि. बा. पाटील यांनी मोठा लढा उभारला होता. त्यामुळे या विनातळाला त्यांचे नाव देणं योग्य होईल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचाही पाटलांच्या नावाला विरोध नसेल, असं सांगतानाच नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरात राजकारण होऊ नये, असं आवाहन प्रशांत ठाकूर यांनी केलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जुंपलेली असतानाच आता रायगडमधून तिसंर नाव पुढे आल्याने विमानतळाला कुणाचे नाव दिलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (aimim wants Navi Mumbai international airport to be named after a. r. antulay)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 19 January 2021https://t.co/gk88ubBZLP #mahafastnews | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 19, 2021
संबंधित बातम्या:
ठाकरे की पाटील?; नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन शिवसेना विरुद्ध भाजप
MPL ची सूत्रं स्वीकारताच मिलिंद नार्वेकरांची बॅटिंग, ठाकरे-पवारांच्या फोटोसह होर्डिंगबाजी
चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊ नका; मनसेची भूमिका
(aimim wants Navi Mumbai international airport to be named after a. r. antulay)