अलमट्टीतून 5 लाख, कोयनेतून 77 हजार 987, तर राधानगरीतून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे खुले आहेत. त्यामधून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे,
मुंबई : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून (Almatti Dam Outflow) 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे (Radhanagari dam) स्वयंचलित 4 दरवाजे खुले आहेत. त्यामधून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिली . आज सकाळी 7 वाजता कोयना धरणामधून (Koyna dam) 77987 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
Dam level Status details as on 10- 8 – 2019 at 6.00am
Narayanpur dam: 5.40lakh cusecs and inflow is 5.5lakh cusecs Present level is 488.30m —— Almatti Dam: Inflow is 5.15 lakh cusecs Outflow is 5.00 lakh cusecs
— CM of Karnataka (@CMofKarnataka) August 10, 2019
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 52 फूट 2 इंच होती. एकूण 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.30 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.28 टीएमसी, वारणा 32.26 टीएमसी, दूधगंगा 23.15 टीएमसी, कासारी 2.52 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.53 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.40, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 52.2 फूट, सुर्वे 49.7 फूट, रुई 80.5 फूट, इचलकरंजी 78 फूट, तेरवाड 82.6 फूट, शिरोळ 78 फूट, नृसिंहवाडी 78 फूट, राजापूर 62.8 फूट तर नजीकच्या सांगली 56.6 फूट आणि अंकली 61.8 फूट अशी आहे.
पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचणवाडी व भाटणवाडी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली, सुक्याचीवाडी, शेळोली, तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन.फ, वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी, म्हसूर्ली व शेळोशी व चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे एकूण 107 बंधारे पाण्याखाली आहेत.
नजिकच्या अलमट्टी धरणात 88.76 टीएमसी तर कोयना धरणात 103.19 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.