पावसामुळे सोयाबीन गेलं, आता कपाशीला बोंडअळी आली, आर्थिक अडचणीतून शेतकऱ्याची आत्महत्या

दिवाळी कशी साजरी करायची या आर्थिक विवंचनेतून या शेतकऱ्याने गळफास घेतला. (Amravati Farmer Commit suicide due to financial loss) 

पावसामुळे सोयाबीन गेलं, आता कपाशीला बोंडअळी आली, आर्थिक अडचणीतून शेतकऱ्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 11:53 AM

अमरावती : अमरावतीतील तिवसा तालुक्यातील एका 54 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपाशीला आलेली बोंड अळी पाहून नुकसान झाल्याने दिवाळी कशी साजरी करायची या आर्थिक विवंचनेतून या शेतकऱ्याने गळफास घेतला. देवराव सांभारे (54) असे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. (Amravati Farmer Commit suicide due to financial loss)

मिळालेल्या माहितीनुसार, देवराव सांभारे यांच्याकडे  चार एकर शेती आहे. त्यातील दोन एकर शेतीत त्यांनी सोयाबीनची तर उर्वरित शेतात त्यांनी कपाशीची लागवड केली होती. त्यातील सोयाबीनच्या शेताच्या परतीच्या पावसामुळे आणि खोडकिड्यामुळे नुकसान झाले.

त्यामुळे त्या शेतकऱ्याची सर्व भिस्त ही कपाशीवर होती. मात्र कपाशीवरही बोंड अळीने घात केला. त्यामुळे कपाशी पूर्णपणे सडली. या शेतकऱ्याने स्वत: शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पण कपाशीवरील बोंड अळीमुळे सर्व कपाशी ही मातीमोल झाली होती.

शेतात लागवड केलेल्या दोन्ही पिकांचे नुकसान झाल्याचे पाहून त्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतकऱ्याने नुकसान पाहून थेट घरी येऊन गळफास लावत आत्महत्या केली.

दिवाळी तोंडावर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेजची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे काही शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  (Amravati Farmer Commit suicide due to financial loss)

संबंधित बातम्या : 

मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच; पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्या; अन्यथा महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.