पिंजऱ्याच्या बाहेर संजय राऊत आले म्हणजे ते वाघ नव्हेत, वाघ हा वाघचं असतो, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया नेमकी काय?
खोके घेतलेलं दाखवून द्यावं. एखादा पकडला गेला असता. हे एवढं सोपं आहे का.
औरंगाबाद : औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले, आम्ही उठाव केल्यानंतर आदित्य ठाकरे यांची पैठणला दुसरी बैठक आहे. त्यांनी यापूर्वी चकरा मारल्या असत्या तर तालुक्याला सहानुभूती वाटली असती. पण, आता आदित्य ठाकरे यांच्या येण्या-जाण्यानं काही फरक पडणार नाही. त्यांनी येत राहावं. त्यांचं स्वागत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत हे काल जेलच्या बाहेर आलेत. पिंजऱ्याच्या बाहेर संजय राऊत आले म्हणजे ते काही वाघ होत नाही. वाघ वाघ असतो. हा कोर्टाचा निर्णय आहे. त्या निर्यणाचं आम्ही स्वागत करतो. जे काही असेल ते कोर्टाचा निर्णय आम्ही मान्य करतो.
ज्यावेळी संजय राऊत होते, त्यावेळी काही झालं नाही. आता हे आत गेल्यानं नि बाहेर आल्यानं काही फरक पडणार नसल्याचं संदीपान भुमरे म्हणाले. काही फरक पडत नाही. कारण संजय राऊत हे फक्त बोलतात. करत काहीच नाही.
खोके घेतलेल दाखवून द्यावं. एखादा पकडला गेला असता. हे एवढं सोपं आहे का. खोटे आरोप करायचं बदनाम करायचं. याशिवाय त्यांच्याकडं काही राहील नाही.
शिंदे हे जनतेची कामं करत आहेत. अनेक निर्णय त्यांनी घेतली. आता त्यांना राज्यात फिरायला वेळ आहे. बदनामीशिवाय काही राहीलं नाही, असं प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिलंय.
साखर गाळपाचा हंगाम सुरू झाला. शेतकरी मोठ्या संख्येनं आलेत. व्हॉट्सअप आणि फेसबूकवर तेवढं सांगितलं होतं. तरीही शेतकरी मोठ्या संख्येनं आलेत, असं संदीपान भुमरे यांनी सांगितलं.