मुख्यमंत्र्यांचा दुष्काळग्रस्त भागातील 500 हून अधिक सरपंचांशी फोनवर संवाद

मुंबई : दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील सरपंच आणि ग्रामवेवकांशी संवाद साधला. ऑडिओ ब्रिज सिस्टमच्या माध्यमातून हा संवाद साधण्यात आला. जनावरांना चारा आणि टँकरच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय सरपंचांकडून सूचनाही जाणून घेण्यात आल्या. या मुद्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]

मुख्यमंत्र्यांचा दुष्काळग्रस्त भागातील 500 हून अधिक सरपंचांशी फोनवर संवाद
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

मुंबई : दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील सरपंच आणि ग्रामवेवकांशी संवाद साधला. ऑडिओ ब्रिज सिस्टमच्या माध्यमातून हा संवाद साधण्यात आला. जनावरांना चारा आणि टँकरच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय सरपंचांकडून सूचनाही जाणून घेण्यात आल्या. या मुद्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे 500 हून अधिक सरपंच आणि ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधला. यावेळी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ग्रामसेवकांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. सरपंच आणि ग्रामसेवकांनी यावेळी त्यांच्या गावांमधील टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या, प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, जनावरांसाठीचे पाणी, रोहयोची कामे, जलसंधारणाची कामे, पाणीपुरवठा योजनांसाठी वीजेचा प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून गावातील परिस्थिती सांगितली.

चारा छावणी उपलब्ध होण्यासाठीच्या अटी शिथील करण्यात याव्यात अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मागच्या काळात चारा छावण्यांच्या बाबतीत अनियमीतता झाल्याने कॅगच्या अहवालानुसार काही अटी टाकण्यात आल्या आहेत. पण तरीही विचार करुन त्यातील काही अटी शिथील करु, असे ते म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील अमोल डकाले यांनी त्यांच्या गावासाठी टँकरच्या दोन फेऱ्या मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात टँकरची एकच फेरी गावात येते अशी तक्रार केली. त्याची दखल घेत तहसीलदारांनी याची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

रोजगार नसल्याची तक्रारही सिल्लोड तालुक्यातील सरपंचांनी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मनरेगा योजनेंतर्गत ‘मागेल त्याला रोजगार’ देण्यात येत आहे. मनरेगा योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली असून ती गावात राबवून लोकांना रोजगार मिळवून द्यावा. मनरेगाअंतर्गत विविध 28 प्रकारची कामे वाढविण्यात आली आहेत. यामध्ये शाळेच्या कंपाऊंडपासून विविध कामे करता येतात. याचा लाभ घेऊन लोकांना रोजगार देण्याबरोबर गावात पायाभूत सुविधांची शाश्वत कामे तयार करण्यात यावीत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.