मुख्यमंत्री फडणवीसांचं चॅलेंज स्वीकारलं, नाना पटोलेंची घोषणा

काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं  (Devendra Fadnavis) कामाचा हिशोब मांडण्याचेआव्हान स्वीकारलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या सभेत अमरावती येथे विरोधकांना त्यांनी काय काम केलं आणि सरकारने काय काम केलं हे सांगण्याचं आव्हान दिलं होतं.

मुख्यमंत्री फडणवीसांचं चॅलेंज स्वीकारलं, नाना पटोलेंची घोषणा
Follow us
| Updated on: Aug 03, 2019 | 8:40 PM

मुंबई : काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं  (Devendra Fadnavis) कामाचा हिशोब मांडण्याचेआव्हान स्वीकारलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या सभेत अमरावती येथे विरोधकांना त्यांनी काय काम केलं आणि सरकारने काय काम केलं हे सांगण्याचं आव्हान दिलं होतं. तसंच आपण कमी पडलो, तर महाजनादेश (Mahajanadesh) यात्रेला जाणार नाही, असंही नमूद केलं होतं.

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या आव्हानावर पटोले म्हणाले, “मुख्यमंत्री यांचं वादविवादाचं आव्हान मी घेतो. मी मुख्यमंत्री यांच्यासमोर वादविवाद करायला तयार आहे. ते  महाजनादेश यात्रेसाठी जेथे जेथे मेळावे घेतील, तेथे तेथे आम्ही पर्दाफाश मेळावे घेऊ.”

मुख्यमंत्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमीवर खोटं बोलले

मुख्यमंत्री फडणवीस संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमीवर खोटं बोलल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीसांनी या राज्याचा दुप्पट विकास केल्याचा दावा केला. मात्र, असं काहीही नसून खरंतर राज्यावर कर्जाच्या बोजात दुप्पट वाढ झाली आहे. मुख्यमंत्री संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमी मोझरी येथे येऊन खोटं बोलले. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने ‘फडणवीस दामदुप्पट पर्दाफाश महामेळावे’ घेऊ. तसेच मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा पुराव्यानिशी जनतेसमोर मांडू.”

‘मुख्यमंत्री फडणवीस गुजरातचे दलाल’

दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाच्या पाण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस गुजरातचे दलाल असल्याचा घणाघाती आरोप केला. दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाच्या पाण्यावर गुजरातचा 1 लिटरचाही हक्क नसताना मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प आंतरराज्यीय म्हणून का घोषित केला असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते?

“महाराष्ट्रातील गावागावात जाऊन सेवा करण्यासाठी या यात्रेची सुरुवात आम्ही करत आहोत. देशात मोदींच्या नेतृत्वात गाव, गरिब आणि किसान ही त्रिसूत्री घेऊन काम केले. विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं ते सांगा. आम्ही कमी पडलो असेल, तर महाजनादेश यात्रेला निघणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.