खडसेंचा दमानियांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी जळगाव न्यायालयाने दमानियांना समन्स जारी केलं आहे (Court Summons Anjali Damania).

खडसेंचा दमानियांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा, कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Follow us
| Updated on: Jan 11, 2020 | 9:07 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी जळगाव न्यायालयाने दमानियांना समन्स जारी केलं आहे (Court Summons Anjali Damania). दमानियांना 23 जानेवारी स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात दमानिया आणि खडसे यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं आहेत. अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांना राजकारणात काहीही करण्यासारखं राहिलं नाही म्हणूनच ते माझा छळ करत असल्याचा आरोप केला आहे (Court Summons Anjali Damania).

अंजली दमानिया म्हणाल्या, “राजकारणात करण्यासारखं काही न राहिल्याने एकनाथ खडसे यांचा वेळ जात नाही. त्यामुळे ते अनेक मार्गांनी माझा छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मला पुन्हा एकदा समन्स मिळाला आहे. जळगाव न्यायालयाने मला समन्स पाठवून 23 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. मी प्रत्येक न्यायालयात जाईल, मात्र खडसे यांच्याविरोधातील लढा कधीही थांबवणार नाही. हेच आश्वासन मी खडसेंना देते.”

नेमकं प्रकरण काय?

अंजली दमानिया यांनी खडसेंविरोधात भोसरीत जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळचं हे प्रकरण आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तींकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली.

पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करुन स्टँप ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. या सर्व प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

दरम्यान, मे 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचं नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला होता.

याच प्रकरणी एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांनी निराधार आरोप करत आपली बदनामी केल्याचं म्हणत दमानिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

खडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली!

मुख्यमंत्री महोदय, मला भ्रष्टाचाराचा डाग घेऊन जायचं नाही, खडसे भावूक

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.