शीतल आमटेंच्या निधनानंतर तरी त्यांच्या कामांना, विचारांना न्याय मिळाला पाहिजे – नीलम गोऱ्हे

शीतलच्या अशा अचानक धक्कादायक आणि ज्या प्रकारे निधन झाल्याचं कळलं त्याचा मला फार मोठा धक्का बसल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

शीतल आमटेंच्या निधनानंतर तरी त्यांच्या कामांना, विचारांना न्याय मिळाला पाहिजे - नीलम गोऱ्हे
शीतल आमटे यांच्या नेतृत्वात आनंदवनमध्ये शेतीचे अनेक प्रयोग झाले.
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 8:33 PM

मुंबई : डॉ. शीतल आमटे करजगी यांचं आज अत्यंत धक्कादायक असं निधन झालं. त्यांचा माझा गेले काही महिने परिचय अधिक चांगल्या प्रकारे झाला होता. 25 नोव्हेंबर 2020 ला माझे आणि त्यांचे बोलणं झालं होते. तेच आमचे शेवटचे बोलणे ठरले अशा शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शीतल यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. (Even after the death of Sheetal Amte his deeds and thoughts should get justice said by Neelam Gorhe)

इतकंच नाही तर कौटुंबिक प्रश्नाच्या बरोबर त्यांच्या मनात कोणते विषय येत होते. त्यांना कोणत्या अडचणी जाणवत होत्या, त्या बद्दलसुद्धा आम्ही बोललो होतो. त्यानंतर शीतलच्या अशा अचानक धक्कादायक आणि ज्या प्रकारे निधन झाल्याचं कळलं त्याचा मला फार मोठा धक्का बसल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, ‘त्या अत्यंत सुविद्य, हुशार, कष्टाळू, कृतिशील समाज सुधारक आणि वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असणाऱ्या होत्या. अनेक आकांक्षा असलेल्या त्या भावनाप्रधान सामाजिक कार्यकर्त्या होत्या. आमच्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सला त्या महिलांच्या उद्योजकतेच्या विषयामध्ये सामाजिक संस्थांनीने तयार केलेले उद्योग आणि त्याच्यामधली भूमिका या विषयावर त्या सहभागी देखील झाल्या होत्या. मनोगतही मांडले होते.’ असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगतलं.

यावेळी त्यांनी शीतल यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘शीतलच्या निधनाने एक अतिशय उमदे असे नेतृत्व आपण गमावलेले आहे. ज्या प्रकारे त्यांनी कुष्ठ रोग्याची सेवा केली, त्याचे व्हीडिओसुद्धा त्यांनी मला बघण्यासाठी पाठवले होते. अत्यंत कष्ट घेऊन त्या सगळे ते काम दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत होत्या. त्यांना काही सरकारच्याकडून राहिलेल्या प्रकल्पांबद्दल त्यांना काही सहकार्य पाहिजे होती, त्या बद्दलसुद्धा मी त्यांना सांगितले होते. की तुम्ही मला तसे पत्र द्या जेणेकरून त्या त्या विभागाच्या तर्फे पाठपुरावा करायला मदत करते अशी मी ग्वाही दिली होती व शीतल यांनी आभार ही कळवले होते.’ असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. (Even after the death of Sheetal Amte his deeds and thoughts should get justice said by Neelam Gorhe)

तर ‘शीतल आमटे करजगी यांच्या दुःखद निधनाबद्दल मी श्रद्धांजली व्यक्त करते. त्यांच्यावर प्रेम करणारा आणि ज्यांना त्या हव्या होत्या, ज्यांना त्यांचे महत्व होते. त्यांच्या आणि जे त्यांचे बाकीचे जे सुह्रद, परिवार होते यांच्या दुःखात मी सहभागी आहे. शीतल यांच्या विचारांना त्याच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा असे मला निश्चित वाटते.’ अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी शीतल आमटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

इतर बातम्या –

Photos : समाजसेवेचा अविरत वसा घेणाऱ्या आमटे कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या ‘डॉ. शीतल आमटे-कराजगी’

आमटे कुटुंबात नेमका वाद कोणता; डॉ. शीतल आमटे-कराजगींनी का उचललं टोकाचं पाऊल?

(Even after the death of Sheetal Amte his deeds and thoughts should get justice said by Neelam Gorhe)

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.