आजीने आणलेला ढोकळा खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा

खेड शहरात ढोकळा खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा झाली. ढोकळा खाल्ल्यानंतर या मुलांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यांना मळमळ होऊ लागली. काही समजण्याच्या आत यापैकी तीन मुलं बेशुद्ध झाली.

आजीने आणलेला ढोकळा खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा
Follow us
| Updated on: Jun 09, 2019 | 9:33 AM

रत्नागिरी : खेड शहरात ढोकळा खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा झाली आहे. मुख्य बाजारपेठेतील मिठाईच्या दुकानातील ढोकळा खाल्ल्याने पाच लहान मुलांना विषबाधा झाली. ढोकळा खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी घरच्यांकडे केली. त्यानंतर या पाच मुलांपैकी तिघे बेशुद्ध झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ही मुलं सुसरी नंबर 2 येथे राहातात. मुलांची आजी शनिवारी (8 जून) सकाळी खेड येथील बाजारपेठेत आली होती. परत जाताने तिने आपल्या नातवंडांसाठी खाऊ म्हणून मिठाईच्या दुकानातून ढोकळा घेतला. घरी गेल्यानंतर तिने मोठ्या आनंदाने हा ढोकळा आपल्या नातवंडांना खायला दिला. नातवंडही ढोकळा बघून आनंदी झाली. त्यांनी तो ढोकळा खाल्ला.

ढोकळा खाल्ल्यानंतर या मुलांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यांना मळमळ होऊ लागली. काही समजण्याच्या आत यापैकी तीन मुलं बेशुद्ध झाली. त्यानंतर आजीने ग्रामस्थांच्या मदतीने नातवंडांना खेडच्या कळंबणी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, मुलांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना मदत ग्रुपच्या मदतीने डेरवण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.