दिवसभर वाट पाहूनही पालकमंत्री आलेच नाही, शेतकऱ्यांचा संताप

हिंगोली : सध्या सर्वच जिल्ह्याचे पालकमंत्री दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शेतकरी मंत्र्यांना आपल्या समस्या सांगत आहेत. पण हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर शेतकऱ्यांचा संताप झालाय. दिवसभर वाट पाहूनही आपण येत नसल्याचं कळवल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. दिलीप कांबळेंचा दौरा आता उद्यावर ढकलण्यात आलाय. समस्या सांगण्यासाठी शेतकऱ्यांनी दिवसभर मंत्री महोदयांची वाट पाहिली, पण ते येणार नसल्याचं […]

दिवसभर वाट पाहूनही पालकमंत्री आलेच नाही, शेतकऱ्यांचा संताप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

हिंगोली : सध्या सर्वच जिल्ह्याचे पालकमंत्री दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शेतकरी मंत्र्यांना आपल्या समस्या सांगत आहेत. पण हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर शेतकऱ्यांचा संताप झालाय. दिवसभर वाट पाहूनही आपण येत नसल्याचं कळवल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. दिलीप कांबळेंचा दौरा आता उद्यावर ढकलण्यात आलाय. समस्या सांगण्यासाठी शेतकऱ्यांनी दिवसभर मंत्री महोदयांची वाट पाहिली, पण ते येणार नसल्याचं सायंकाळी कळवण्यात आलं.

वसमत तालुक्यातील पिंपरी आणि आंबा या गावाला दिलीप कांबळे भेट देणार होते. तर औंढा तालुक्यातील येहळेगाव सोळंके आणि शहीद पोलीस जवान संतोष चव्हाण यांच्या ब्राह्मणवाडा गावात जाऊन सांत्वनपर भेट देणार होते. पण सकाळी साडेदहा वाजता येणारे मंत्री महोदय दुपारी हिंगोलीत पोहोचले. भेटीतलं पहिलं गाव असलेल्या उमरा येथे त्यांनी 5 वाजता भेट दिली. त्यानंतर शिवणी आणि रामवाडी येथे भेट दिली. यातच सहा वाजले आणि मंत्री महोदयांनी वसमत आणि औंढा तालुक्यातील दौरा पुढे ढकलला.

भरउन्हात दुपारपासून उभे असलेले पिंपरीचे शेतकरी यामुळे चांगलेच संतापले. ऐन दुष्काळातही भाजपच्या मंत्र्यांना दुष्काळग्रस्तांच्या संवेदना समजत नसल्याचा संताप व्यक्त केला. पालकमंत्री येणार म्हणून गावकऱ्यांनी तयारी केली होती, पण सायंकाळचे सात वाजले तरी पालकमंत्री आलेच नसल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला आणि त्यांनी संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पालकमंत्र्यांना फोनवरुन संपर्क साधला असता, आता उशीर झाल्यामुळे आजचा दौरा उद्या करणार असल्याचं पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.