मुंबईकरांनो सावधान, राज्यात उष्णतेची लाट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात कमालीची वाढ होत असून मार्च अखेरीस राज्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात राज्यात तापमान वाढ कायम राहणार असून सर्वत्र उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात कमालीची वाढ होत असून मार्च अखेरीस राज्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात राज्यात तापमान वाढ कायम राहणार असून सर्वत्र उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागतर्फे करण्यात आले आहे.
Yesterday daytime max in Mumbai was 36.7C. Today & tomorrow will be 37-39C. 42-43C in surrounding areas. From Wednesday temperatures will decrease and settle around 34-35C next few days.
— Mumbai Weather (@IndianWeather_) March 25, 2019
महाराष्ट्रासह मुंबईत सध्या थंडी ते उन्हाळा असा ऋतूबदल होत असून वाऱ्याची दिशाही बदलली आहे. सध्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात मार्च अखेरीस उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अशाचप्रकारचे चढे तापमान मुंबईकरांना अनुभवण्यास मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात येत आहे.
Next 72 hours going to be one of the hottest period of summer in Mumbai. 37-38C likely in Mumbai city and 42-43C in surrounding areas.
— Mumbai Weather (@IndianWeather_) March 24, 2019
In some suburbs like Borivali temperatures right now is 40C. Thane 41C, Dombivali 42C.
— Mumbai Weather (@IndianWeather_) March 25, 2019
दरम्यान, रविवारी मुंबईत हवामान विभागाने 36.7 अंश सेल्सिअसची नोंद केली असून सोमवारी मुंबईतील कमाल तापमान 37 ते 39 अंशापर्यंत पोहोचले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सातांक्रुझ 36.7, कुलाबा 33.5, बोरिवली 40, ठाणे 41, डोंबिवली 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांनाही उन्हाळ्याची चाहूल लागली असून मुंबईकर सर्वत्र शीतपेय, आईस्क्रीमचा आस्वाद घेताना दिसत आहेत.