जालना : सत्यजित तांबे यांच्या प्रकरणापासून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वाद निर्माण झाला. बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांची बाजू लावून धरली. महिनाभरानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली. त्यासंदर्भात पत्र बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडकडं पाठविल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, आम्हाला आताचं कळालं. आम्हीसुद्धा पुण्याहून कैलास गोरंटेवारच्या घरी जे लग्न आहे त्यासाठी आलो आहे. येथे आल्यानंतर ही बातमी कानावर आली.