महापुराचा फटका शाळांनाही, तब्बल 2177 शाळांचं नुकसान, 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी बाधित

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आलेल्या महापुराचा जिल्हा परिषदेच्या शाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात तब्बल 2177 शाळांचं पुराने नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी पुराने प्रभावित झाले आहेत.

महापुराचा फटका शाळांनाही, तब्बल 2177 शाळांचं नुकसान, 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी बाधित
Follow us
| Updated on: Aug 11, 2019 | 8:45 PM

पुणे: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आलेल्या महापुराचा जिल्हा परिषदेच्या शाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात तब्बल 2177 शाळांचं पुराने नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थी पुराने प्रभावित झाले आहेत. या शाळांची दुरुस्ती आणि शैक्षणिक साहित्याची नुकसान भरपाई यासाठी एकूण 57 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली. ते रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरग्रस्त शाळांचा आढावा घेतला. यावेळी शेलार यांनी राज्यात अतिवृष्टीने 8 शिक्षण विभागांपैकी 6 विभागांना पुराचा फटका बसल्याचं सांगितलं. 21 जिल्ह्यातील 155 तालुक्यांच्या शाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यात 53 वर्गखोल्यांचं संपूर्ण बांधकाम करावं लागणार आहे. तसेच 2177 शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी लागले.

पुरात 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांचंही नुकसान झालं आहे. पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याची माहिती घेऊन या जिल्ह्यांना देखील निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

पूर ओसरल्यावर शाळांच्या थेट खात्यावर पैसे वर्ग करु, असेही आश्वासन यावेळी शेलार यांनी दिले. ते म्हणाले, “धोकादायक शाळांची पुनर्बांधणी केली जाईल. पिण्याच्या टाक्या देखील दुरुस्ती केली जाईल. विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचार पुरवले जातील. तसेच शाळांमध्ये जाण्यासाठी पुल दुरुस्तीसाठीही प्रयत्न करु. पुस्तके वाहून गेलेल्या 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांना पुस्तके दिले जाणार आहेत. हिंदी, उर्दू आणि अन्य भाषांची पुस्तके उपलब्ध आहेत. वीज आणि डिजीटल वस्तूंची दूरुस्ती देखील केली जाईल.”

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.