रत्नागिरी रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या; माजी मुख्य सचिवांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

रत्नागिरी रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या, असा सल्ला राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

रत्नागिरी रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या; माजी मुख्य सचिवांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
Nanar Refinery Supporters
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 1:14 PM

रत्नागिरी : येथील रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या, असा सल्ला राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सचा अहवाल सरकारने विचारात घ्यावा, असेही सुखथनकर यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबद्दलचा विचार लवकर व्हावा, असा सल्ला सुखथनकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. (Make a decision on Ratnagiri refinery; Former Chief Secretary D. M. Sukthankar advice to CM Uddhav Thackeray)

रत्नागिरी रिफायनरीबाबत तुमची भूमिका काय? असा सवाल टीव्ही 9 ने सुकथनकर यांना केला होता. त्यावर बोलताना सुकथनकर यांनी रिफायनरीबाबत अनुकूलता दर्शवली. द. म. सुकथनकर हे रत्नागिरी रिफायनरीबाबत प्रकल्पग्रस्तांची मने वळवण्यासाठी युती सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचे प्रमुख होते. परंतु रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प सरकारकडून रद्द करण्यात आला.

कोरोना काळातील संकटात अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स नेमली होती. या टास्क फोर्समध्ये पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष विजय केळळकर यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींचा समावेश होता.

रोजगार वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी सुरु करण्याची या टास्क फोर्सने शिफारस केली होती. माहिती आणि जनसंपर्क सहसंचालयाच्या महासंवादच्या पेजवर टास्क फोर्सची अधिकृत माहिती देण्यात आली होती. सध्या रिफायनरीला समर्थन वाढत असताना सुखथनकर यांनी सरकारला केलेल्या विनंतीमुळे हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने थेट आव्हान दिलं आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडेल, पण रत्नागिरीचा रिफायनरी प्रकल्प होणारच असं खुलं आव्हान दिलं आहे. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील त्या दिवशी नाणारची अधिसूचना निघेल, असाही दावा जठार यांनी केला.

संबंधित बातम्या

‘सरकार पडेल, पण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणारच’, भाजप नेत्याचं शिवसेनेला आव्हान

‘नाणार’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा

(Make a decision on Ratnagiri refinery; Former Chief Secretary D. M. Sukthankar advice to CM Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.