नागपुरात 5 वर्षात 1592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 617 पीडित कुटुंबं मदतीसाठीही अपात्र
राज्यात सरकार कोणाचंही असो मात्र शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही (Suicide Farmers Family).
नागपूर : राज्यात सरकार कोणाचंही असो मात्र शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही (Suicide Farmers Family). मागील 5 वर्षात एकट्या नागपूर विभागात 1592 शेतकऱ्यांनी आयुष्याला कंटाळून आत्महत्या केल्या. असं होऊनही 1592 पैकी केवळ 901 शेतकऱ्यांच्या आत्महत्याच सरकारी मदतीसाठी पात्र ठरल्या. इतर 617 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आल्या (Suicide Farmers Family). माहिती अधिकारातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
विदर्भाची भूमी कधीकाळी सुपीक भूमी समजली जायची. मात्र, त्याच भूमीत मोठ्या प्रमाणात बळीराजाच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे विदर्भाची ओळख आत्महत्यांचा प्रदेश अशी झाली. ही ओळख पुसण्याचे अनेक प्रयत्न होत असल्याचं प्रत्येक सरकार सांगतं. मात्र, अजून ते झालेलं दिसत नाही.
मागल 5 वर्षातील एकट्या नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांचा विचार केला तर 1592 एवढ्या आत्महत्या झाल्याचं पुढे आलं. त्यात फक्त 901 प्रकरणं पात्र ठरली, तर 617 अपात्र ठरली. जे पात्र ठरली. पात्र 901 कुटुंबांना 5 वर्षात 9 कोटी 1 लाख रुपयांची सरकारी मदत देण्यात आली. मात्र, अपात्र ठरलेल्या कुटुंबांना काहीही मदत मिळाली नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर यांनी दिली.
2015 ते 2019 दरम्यान नागपूर विभागातील जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्या
नागपूर – 256
वर्धा – 623
भंडारा – 206
गोंदिया – 107
चंद्रपूर – 352
गडचिरोली – 48
नागपूर विभागातील एकूण 1592 आत्महत्यापैकी सर्वात कमी आत्महत्या मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात झाल्या. असं असलं तरी एकूण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांपैकी अत्यंत कमी कुटुंबांना आर्थिक मदत मिळताना दिसत आहे. या आत्महत्यांवर प्रत्येक जण बोलत असलं, आपापली मतं व्यक्त करत असलं तरी आत्महत्येच्या संख्येत घट होताना दिसत नाही. त्यामुळे एकूणच या विषयावर गांभीर्याने विचार करुन ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे.