आधी भाजप नेते प्रसाद लाड आणि राज ठाकरेंची भेट, आता मनसे आमदार राजू पाटील गडकरींच्या भेटीला

भाजप नेते प्रसाद लाड यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे (MNS MLA Raju Patil meet Nitin Gadkari)

आधी भाजप नेते प्रसाद लाड आणि राज ठाकरेंची भेट, आता मनसे आमदार राजू पाटील गडकरींच्या भेटीला
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 5:14 PM

ठाणे : भाजप नेते प्रसाद लाड यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही भेट राजकीय नसून केवळ विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी झाल्याची माहिती समोर येत आहे. डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजूरीसाठी राजू पाटील यांनी नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. त्यांनी गडकरींना याबाबबतचे पत्र सुद्धा दिले आहे (MNS MLA Raju Patil meet Nitin Gadkari).

डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न 2009 पासून प्रलंबित आहे. तत्कालीन दिवंगत आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करुन सतत पाठपुरावा केला होता. त्यावेळी या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने 93 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला. या प्रस्तावाला अद्यापही गती मिळालेली नाही (MNS MLA Raju Patil meet Nitin Gadkari).

सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रस्ते वाहतुकीचे महत्त्व सर्वांना कळत आहे. दिवा, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली परिसरातील नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्यावर अवलंबून रहावे लागत आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. या परिसरातील वाढत्या नागरिकरणामुळे भविष्यात कल्याण शिळ रस्त्यावरुन पायी चालायला जागा उरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्ता अत्यंत आवश्यक आहे. कारण या परिसरातही मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे.

तसेच आजही डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांना रेल्वे वाहतुकीशिवाय कोणताही पर्याय नाही. अतिवृष्टी किंवा तांत्रिक कारणामुळे रेल्वेसेवा बंद पडल्यास येथील रहिवाशांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. याआधी अनेक वेळा असे प्रकार घडलेले असून चार-चार दिवस लोकांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. त्यामुळे हा रस्ता होणे महत्त्वाचे आहे, अशी मागणी डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा येथील प्रवाशांची आहे.

“सर्व तांत्रिक अडचणीवर मात करुन पर्यावरणाचा समतोल राखून, खाजगी जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन हा रस्ता पूर्ण करणे शक्य आहे. तरी  डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध होईल”, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली.

“वास्तविक हा रस्ता झाला तर डोंबिवली ते मुंब्रा हे अंतर 5 ते 7 मिनिटांवर येईल. परंतु मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नुकतेच खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे 19 किमीचे अंतर फक्त 6 कि.मी. ने कमी होऊन 13.3 किमी इतके होईल. त्यासाठी 6600 कोटी रुपये खर्च करणाऱ्या MSRDC ला दुर्दैवाने सदर रस्ता लवकर व्हावा हे आवश्यक वाटले नाही. आणि म्हणूनच आज केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांना ‘भिवंडी-नाशिक राष्ट्रीय महामार्ग व ठाणे-पनवेल राष्ट्रीय महामार्ग (मुंब्रा येथे जोडून ) या दोन्ही रस्त्यांना मानकोली-डोंबिवली-दिवा-मुंब्रा असे जोडून सदरचे प्रकल्प केंद्रीय स्तरावर राबविण्यात यावा ही विनंती केली. यामुळे भविष्यात ह्या रस्त्याला मंजुरी मिळाली तर नक्कीच ठाणे पलीकडील प्रवाश्यांना फायदा होणार आहे”, असं राजू पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा : विजय वडेट्टीवार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.