बीएमसीचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या अजोय मेहतांना अभय का?

मुंबई : शासन आणि प्रशासन हे व्यवस्थेचे दोन प्रमुख अंग असतात. निर्णय घेणं हे शासनाचं काम असतं, तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी हे प्रशासनाचं काम आहे. शिवाय आवश्यक असलेल्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर निर्णयाची शिफारस करणं हे प्रशासनाचं काम आहे. पण हा नियम देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबईसाठी लागू होत नाही का? हा प्रश्न […]

बीएमसीचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या अजोय मेहतांना अभय का?
अजोय मेहता
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : शासन आणि प्रशासन हे व्यवस्थेचे दोन प्रमुख अंग असतात. निर्णय घेणं हे शासनाचं काम असतं, तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी हे प्रशासनाचं काम आहे. शिवाय आवश्यक असलेल्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर निर्णयाची शिफारस करणं हे प्रशासनाचं काम आहे. पण हा नियम देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबईसाठी लागू होत नाही का? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारणही तसंच आहे. कारण, बीएमसीचे प्रशासकीय प्रमुख असलेले महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अजून कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. प्रशासकीय प्रमुख या नात्याने ऑडिट झाल्यानंतरही ही दुर्घटना का झाली, किंवा या आडिटला आयुक्तांनी मान्यता का दिली, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आयुक्त सध्या माध्यमांपासून पळ काढत आहेत.

महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या माहितीनुसार, या पुलाचं एक वर्षापूर्वीच ऑडिट झालं होतं. हा पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. तांत्रिकदृष्ट्या या पुलाची जबाबदारी आयुक्त अजोय मेहता आणि अभियांत्रिकी विभागाची आहे. त्यामुळे आयुक्तांना अटक करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

जाणकारांच्या मते, या बाबतीत महापौरांना फक्त आदेश देण्याचे अधिकार असतात. अजोय मेहतांना आयुक्तपदाची जबाबदारी एप्रिल 2015 मध्ये दिली. महापालिकेच्या अखत्यारित एकूण 350 पूल येतात. या सर्व पुलांच्या देखरेखीची आणि डागडुजीची जबाबदारी महापालिकेची आहे. सीएसएमटीजवळ जो पूल कोसळला त्यामध्ये मुख्य अभियांत्रिकी, कार्यकारी अभियांत्रिकी, सहाय्यक अभियांत्रिकी, उप अभियांत्रिकी, कनिष्ठ अभियांत्रिकी या सर्वांची जबाबदारी आहे.  गेल्या सहा महिन्यांपासून दराडे नावाचे अभियांत्रिकी आहेत, त्यापूर्वी कोरी नावाचे अभियांत्रिकी होते.

गुरुवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये 6 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. हा पूल मुंबई महापालिकेचाच असल्याचे महापालिकेने कबूल केले आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.