Eknath Shinde Is New CM Of Maharashtra: आज साडे सात वाजता एकनाथ शिंदे एकटेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
ही तत्वांची लढाई. हिंदुत्वाची लढाई आहे. विचारांची लढाई आहे. भाजप शिंदेंना भाजप पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एकट्याचाच शपथ विधी होईल. नंतर आम्ही विस्तार करू. त्यात शिवसेनेचे शिंदेंसोबत असलेलेल भाजपचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या सत्ता संघर्षाचा शेवट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एकानाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली आहे(New CM Of Maharashtra). आज सायंकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे एकटेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना झाली. शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. आमच्या मतदारसंघात हरलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवश्यावर लढायचं असा विषय झाल्यानंतर या सर्वांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला की युती तोडायची. ज्या युती सोबत निवडून आलो. ती आघाडी तोडा. त्यासोबत राहायला तयार नाही. दुर्देवाने उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधिक प्राधान्य दिले. त्यांचीच शेवटपर्यंत कास धरली. हा त्यांचा प्रश्न. त्यावर बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सराकर देऊ लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही. असं मी वारंवार सांगत होतो अखेरीस हा निर्णय झाला आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजप आणि १६ अपक्ष आमदार एकत्रं आले आहेत. अजून काही लोक येत आहेत. या सर्वांचं पत्रं आम्हाी राज्यपालांना दिलं. आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही. मुख्यमंत्रीपदासाठी आस नाही. ही तत्वांची लढाई. हिंदुत्वाची लढाई आहे. विचारांची लढाई आहे. भाजप शिंदेंना भाजप पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एकट्याचाच शपथ विधी होईल. नंतर आम्ही विस्तार करू. त्यात शिवसेनेचे शिंदेंसोबत असलेलेल भाजपचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.