राज्यात हुडहुडी, निफाडमध्ये 2.4, मुंबईत 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

मुंबईत शुक्रवारी सकाळी 12.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकच्या निफाडमध्ये या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचे तापमान 2.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

राज्यात हुडहुडी, निफाडमध्ये 2.4, मुंबईत 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 9:00 AM

मुंबई : मुंबईसह राज्यात गुरुवारपासून थंडीचा जोर वाढला आहे (Winter in Maharashtra). मुंबईत शुक्रवारी सकाळी 12.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकच्या निफाडमध्ये या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचे तापमान 2.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. निफाडमधील कुंडेवाडीच्या हवामान विभागात ही नोंद करण्यात आली आहे (Winter in Maharashtra).

मुंबईत इतर शहरांच्या तुलनेत कमी थंडी पडते. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची हौस वाटते. बऱ्याच मुंबईकरांना हवीशी वाटणारी ही थंडी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दाखल झाली आहे. काल (16 जानेवारी) मुंबईचे कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसवर पोहोचले. हा पारा शुक्रवारी सकाळी 12.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला. आज या मोसमातील सर्वाधिक थंडीची नोंद झाली आहे.

थंडी वाढल्यामुळे मुंबईकरांना आता स्वेटर घालून ऑफिसला जावं लागणार आहे. मुंबईत गुरुवारी दुपारच्या वेळी हवेचा पारा हा 25 अंश सेल्सिअर होता. त्यामुळे सकाळपासून सुरु असलेला गारवा दुपारी देखील जाणवत होता. दरम्यान, मुंबईच्या हवामाणातील गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवानान विभागाने दिला आहे. पुढचे दोन ते तीन दिवस हवेतील गारवा कायम असणार आहे.

उत्तरी भागातून वाहणाऱ्या थंड वारे आणि कोरडे वातावरण यामुळे मुंबईसह राज्यात कमालीची थंडी वाढली आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही थंडी सुरु झाली आहे. संपूर्ण राज्यभरात हवेत गारठा आहे. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडी पडली आहे. त्यापाठोपाठ महाबळेश्वर येथे थंडीचा कडाका सुरु आहे.

राज्यातील औरंगाबादमध्ये 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नांदेडमध्ये 14.0 अंश सेल्सिअस तर  अहमदनगरमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.