Gram Panchayat Election Results 2021: ‘मला धक्का देणारा अजून जन्मला नाही’, नाईकांनी डिवचल्यानंतर राणे कडाडले

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: ग्रामपंचायती यावेळी भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे राणेंना धक्का देणारा अजून कुणी जन्माला आलेला नाही, अशा शब्दात नितेश राणे वैभव नाईक यांच्यावर कडाडले. (Nitesh Rane Vaibhav Naik gram panchayat)

Gram Panchayat Election Results 2021: 'मला धक्का देणारा अजून जन्मला नाही', नाईकांनी डिवचल्यानंतर राणे कडाडले
VAIBHAV NAIK AND NITESH RANE
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 3:20 PM

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात 70 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपने जिकंल्या आहेत. आम्ही शिवसेनेला धक्का दिल्ला आहे. यापूर्वी शिवसेनेकडे असलेल्या ग्रामपंचायती यावेळी भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे राणेंना धक्का देणारा अजून कुणी जन्माला आलेला नाही, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे शिवेसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर कडाडले. (Nitesh Rane criticizes Vaibhav Naik on gram panchayat election)

कणकवलीत नितेश राणेंच्या मतदारसंघात 3 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. शिवसेनेने राणेंना धक्का दिला आहे, असे विधान करत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना डिवचले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. “सिंधुदुर्गातील 70 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. आम्ही शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेकडे यापूर्वी असलेल्या तोडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, चुनवरे कोलगाव या ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहेत. या निकालावरून राज्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे; हे स्पष्ट होते” असे नितेश राणे म्हणाले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसुद्धा आमचीच

यावेळी बोलताना आगामी काळात कोकणात शिवसेनेचे अस्तित्व नाहीसे होईल, असा दावा नितेश राणे यांनी केला. “सिंधुदुर्गातील आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व पाहता येथील जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट होते. आता पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच जिंकेल,” असे वक्तव्य राणे यांनी केले. तसेच, आगामी काळात विरोधक नष्ट होणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

वैभव नाईक काय म्हणाले ?

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 60 टक्के ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत, असा दावा केला. तसेच, पुढे बोलताना कणकवलीत नितेश राणेंच्या मतदारसंघात 3 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या 2 निवडणुकीत सातत्याने राणेंना धक्का दिला आहे. त्यामुळे राणे यांचं अस्तित्व संपलं असल्याचे नाईक म्हणाले. तसेच राणे यांनी शिवसेनेने धक्का दिला आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

संबंधित बामत्या :

Gram Panchayat Election Results 2021 : जाऊबाई जोरात, काट्याची लढत घरात, जाऊबाईंच्या लढतीत कोण जिंकलं?

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अवघ्या चार मतांनी विजय, सासू-सूनेच्या लढतीत चाव्या कोणाकडे?

सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू

(Nitesh Rane criticizes Vaibhav Naik on gram panchayat election)

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.