…तर या नेत्याचं चपलेनं थोबाड फोडणार, अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल
औरंगजेबाच्या साम्राज्यावर हल्ला केला. ३३ किल्ले परत मिळविले.
अकोला : भाजपचे वादग्रस्त प्रवक्ते सुधांसू त्रिवेदी यांनी काल अकलेचे तारे तोडलेत. सावरकर यांच्या माफीनाम्याची तुलना शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्यासोबत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबासोबत पाच वेळा पत्रव्यवहार केल्याचंही सुधांसू म्हणाले. परंतु, इतिहास असा सांगतो की, औरंगजेबासोबत मिर्झाराजे जयसिंग किंवा अफजलखानासोबत घडलेला पत्रव्यवहार असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पत्रव्यवहार केला का, तर हो. ते खरं आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
औरंगजेब यांचा आदरार्थी उल्लेखही केला. कारण शत्रूस जेरीस आणण्यासाठी तो एक गनिमी कावा होता. याची जगानं दखल घेतली. मात्र, औरंगजेबाच्या आग्रा भेटीच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तह केला.
बादशहाच्या वाढदिवासाला भेटीला गेले.त्यानंतर पत्रव्यवहार झाला. छत्रपती शिवराय यांनी दरबारात बाणेदारपणा दाखविला. शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाचा दरबार धुळकावला असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.
काका म्हणूनही उल्लेख केला असेल. पण, त्यानंतर अफजलखानाला प्रतापगडावर बोलावलं. त्याचा कोथडा काढला. औरंगजेबाच्या साम्राज्यावर हल्ला केला. ३३ किल्ले परत मिळविले. शिवाजी महाराजांनी पत्रव्यवहार केला. दोन पाऊलं मागे आले. पण, शत्रूवर हल्लाही तेवढ्याच ताकदीनं केला.
मात्र, सावरकर जेलमधून आले त्यानंतर त्यांनी कुठलंही बंड केलं नाही. हा इतिहास सांगतो. असं अनेक इतिहासकार म्हणतात, याची आठवण अमोल मिटकरी यांनी करून दिली. त्यामुळं शिवाजी महाराज यांच्या पाच पत्राची तुलना ही सावरकर यांच्या पत्रासोबत करणं, हे अत्यंत मुर्खपणाचं लक्षण आहे, असं मला वाटतं, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
भाजपच्या नेत्यांनी याबद्दल तोंड उघडावं. भाजपची याबद्दल काय मतं आहेत. हे सांगावं. राज्यपालांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर राज्यात रोष आहे. महाराष्ट्रात आल्यास सुधांसू त्रिवेदी या नेत्याचं चपलेनं थोबाड फोडणार, असा हल्लाबोलही अमोल मिटकरी यांनी केला.