वीज बिल थकल्यानं वर्ध्यातील जलसंपदा विभागाचा वीज पुरवठा खंडित, अधिकारी, कर्मचारी उकाड्याने हैराण
वीजेचे बिल न भरल्याने जलसंपदा विभागाच्या कर्मशाळेचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा नसल्याने अधिकारी, कर्मचारी उकाड्याने हैराण झाले आहे.
वर्धा : वीजेचे बिल न भरल्याने जलसंपदा विभागाच्या कर्मशाळेचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा नसल्याने अधिकारी, कर्मचारी उकाड्याने हैराण झाले आहे. तर रात्रीच्या वेळी अंधारात सुरक्षा रक्षकांची कर्तव्य बजावताना कसरत करावी लागणार आहे.
घामाच्या धारा पुसतंच काम
वर्ध्यातील जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी, अभियांत्रिकी कर्मशाळा, उपविभाग क्रमांक तीनचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय. वीज बिल थकल्यानं हा वीज पुरवठा कापण्यात आला आहे. पण, सध्या पावसाच्या लपंडावात वाढलेल्या उकाड्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना घामाच्या धारा पुसतंच काम करावं लागत आहे.
अनेक अधिकारी, कर्मचारी उकाड्यात बसून काम
वर्ध्याच्या जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी, अभियांत्रिकी कर्मशाळा उपविभाग क्रमांक तीन या कार्यालयाचं पाच लाख रुपयांवर वीज बिल थकलं आहे. वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यानं महिनाभरापूर्वी या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला गेला आहे. महिनाभरापासून वीज पुरवठा खंडीत असल्यानं काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना उकाड्यात बसून काम करावं लागतं. त्यामुळं प्रकृती बिघडण्याचीही भीती व्यक्त होतं आहे.
हा परिसर दहा एकरांचा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली आहेत. या झुडपात सरपटणाऱ्या प्राण्यांचं वास्तव्य असतं. त्यामुळे अशास्थितीत रात्रीच्या वेळी काळोखात कर्तव्य बजावताना रात्र पातळीतील सुरक्षा रक्षकांनाही कसरत करावी लागत आहे.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह 14 पक्ष एकवटले; पेगाससप्रकरणावरून आता माघार नाही, राहुल गांधींचा इशाराhttps://t.co/2yAj7aZRX8#RahulGandhi | #sanjayRaut | #ncp | #Congress | #PegasusSpyware
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2021
(Power supply cut off in Wardha Water Resources Department due to power bill pending)
संबंधित बातम्या :
नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे 301 अभ्यासक्रम
सत्ताधारी विरोधकांची बाकं बदलली, पण काळ्या पैशांसंबंधी सरकारची उत्तर सारखीच, राऊतांची टीका