Pune: सरकार म्हणतं गावाचा विकास आराखडा ऑनलाइन भरा, पुण्यातल्या ग्रामपंचायतींसमोर कोणत्या अडचणी?
केंद्र व राज्य सरकार तसेच ग्रामपंचायतींना स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतून गावात काय सुविधा व विकास केला जाणारा आहे याबाबतचा विकास आराखडा तयार करायच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या . याबरोबरच कोणत्या योजनांवर किती खर्च करावा या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पुणे – जिह्यातील अनेक गावात 4जीचे मोबाईला पोहचले असले तरी अनेक गावांमध्ये नेटवर्कची सर्वात मोठी समस्यां या आजही जाणवते. या नेटवर्कच्या समस्येचा सर्वाधिक फटका हा ग्रामपंचायतयामध्ये (Gram Panchayat) कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला बसत आहे. नेमणूक झालेल्या गावात रेंज (network)नसल्यामुळे अनेक ग्रामसेवकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन आराखडे भरण्याचे काम करावे लागत आहेत. येत्या 30 जानेवारीपर्यंत विकास आराखडे भरून देण्याची मुदत आहे. या मुदतीतच काम पूर्ण करावे लागणार आहे.
काय माहिती भरायची आहे
केंद्र व राज्य सरकार तसेच ग्रामपंचायतींना स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतून गावात काय सुविधा व विकास केला जाणारा आहे याबाबतचा विकास आराखडा तयार करायच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या . याबरोबरच कोणत्या योजनांवर किती खर्च करावा या सूचनाही देण्यात आल्या आहेत. योजना राबवत असताना प्रामुख्याने शिक्षण आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन यावर प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. गतवर्षापासून ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे.
ग्रामसेवकांची होतेय दमछाक मावळ तालुक्यात 103 ग्रामपंचायती असून त्यातील 22ऑनलाईन आराखडे तयार करण्यात आलेआहेत. 24 ठिकाणी ऑनलाइन आराखडे भरण्याचे काम सुरु आहे. तर 62विकास आराखड्याचे काम पूर्ण झाले आहे. आराखडा भरताना ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेने दिलेल्या जीपीडीपी फॉरमॅटमध्ये भरायचा आहे. त्यानुसार भरण्यासाठी अनेक ठिकाणी नेटवर्कची मोठी समस्या जाणवत आल्याने ग्रामसेवकांचीदमछाक होताना दिसून येत आहे. अनेकदा गावातून माहिती घेऊन तालुक्याच्या ठिकाणी येऊन ऑनलाईन काम करावे लागत आहे.
पझेशनसाठी बिल्डर टाळाटाळ करतोय? मग ही बातमी वाचाच! ताब्यास विलंब, बिल्डरला ग्राहक आयोगाचा दणका