मुंबई-पुण्यात 120 वर्षांचा रेकॉर्डब्रेक पाऊस

मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 1908 मध्ये सर्वाधिक पाऊस झाला होता. त्यानतंर 112 वर्षांनी जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई-पुण्यात 120 वर्षांचा रेकॉर्डब्रेक पाऊस
Follow us
| Updated on: Jul 30, 2019 | 1:19 PM

मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबई, पुण्यासह, राज्यात मुसळधार पावसाने ( monsoon rain) सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच सततच्या मुसळधार पावसामुळे ( monsoon rain) पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पातळीतही चांगली वाढ  झाली आहे. मात्र जुलै महिन्यात मुंबईत झालेल्या पावसाने 5 किंवा 10 नव्हे तर तब्बल 112 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. पुणे हवामान विभागाने टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला याबाबतची माहिती दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 1908 मध्ये सर्वाधिक पाऊस झाला होता. त्यानतंर 112 वर्षांनी जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर ठाणे आणि पुणे या शहरातही 118 वर्षांनी जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 1901 मध्ये अशाप्रकारे विक्रमी पाऊस झाला होता.

मुंबईत 1907 मध्ये जुलै महिन्यात 1500 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी 28 जुलैपर्यंत मुंबईत सरासरी 1 हजार 492 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही वर्षातील पावसाच्या आकडेवारी तुलना केल्यास मुंबईत जुलै महिन्यात केवळ 8 मिमी पाऊस पडला तर 1907 मधील पावसाचा रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे हवामानतज्ज्ञ पुलक गुहाथाकुर्ता यांनी दिली.

तर पुणे आणि ठाणे या दोन्ही शहरांमध्ये 28 जुलैपर्यंत अनुक्रमे  827.7 मिमी आणि 1975.6 मिमी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 118 वर्षात जुलै महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मुंबईसह राज्यात 1 जुलैपासून 12 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. असेही हवामानतज्ज्ञ पुलक गुहाथाकुर्ता यांनी सांगितले. याआधी 10 दिवसात एखाद्या दिवशी मुसळधार पाऊस पडायचा. मात्र यंदाच्या वर्षी असे न घडता कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कायम पावसाची रिमझिम सुरु होती असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतीला कुलाबा, सांताक्रुझ, विक्टोरिया गार्डन (राणीबाग), जुहू, वरळी पोद्दार शाळा या परिसरातील वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या पावसाची सरासरी नोंद काढण्यात आली आहे. पावसाच्या सरासरी नोंदीनुसार, याआधी जुलै 2016 मध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली होती. तर पुणे आणि ठाणे शहरातही जुलै 2016 मध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान सध्या मान्सूनच्या वारे दक्षिणेकडे सरकत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रासह इतर ठिकाणी अशाचप्रकारे पाऊस होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.