पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचं संकट आलं आहे (Pune Water Shortage).

पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 9:07 AM

पुणे : यंदा पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट कायम आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचं संकट आलं आहे (Pune Water Shortage). धरण प्रकल्पातील चारही धरणात यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने 12 दिवसांमध्ये धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मात्र, मागीलवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी कमीच आहे.

असं असलं तरी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडल्यास पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळू शकते. खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4 धरणातून शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. तर दौंड इंदापूर आणि बारामतीला शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. मात्र पावसाचं प्रमाण कमी असल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. अशास्थितीत पाणी कमी असल्याने खरीप हंगामासाठी या पाणी प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडता आलं नाही.

गेल्यावर्षी 4 धरणांमध्ये एकूण 16.74 टीएमसी म्हणजेच 57.43 टक्के पाणीसाठा होता. सद्य परिस्थितीत चारही धरणातील पाणीसाठा 9.86 टीएमसी म्हणजेच 33.82 टक्के आहे. खडकवासला 41.01 टक्के, पानशेत 39.95 टक्के, वरसगाव 31.77 टक्के, टेमघरमध्ये 19.44 टक्के पाणी साठी आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. मात्र, हा निर्णय ऑगस्टमध्ये किती पाऊस होतो यावरच ठरणार आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोनाच्या स्थितीत काहीशी सुधारणा होत आहे. पुण्याचा मृत्यूदर घटला असून 25 जुलै रोजीच्या महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार पुण्याचा मृत्यूदर हा मुंबईपेक्षा कमी, तर भारतापेक्षा जास्त आहे. पुण्याचा मृत्यूदर 2.45 टक्के, मुंबई 5.59 टक्के इतका आहे. तर महाराष्ट्राचा 3. 65 टक्के आणि भारताचा 2.32 टक्के इतका मृत्यूदर आहे.

पुण्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 हजार 66 वर पोहचली आहे. यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 27 हजार 418 इतकी आहे. सध्या पुण्यात 18 हजार 494 सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 153 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव

Covaxin | कोवॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, 50 जणांवर चाचणी

Pune Water Shortage

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.