प्रवाशांच्या सुरक्षतेची जबाबदारीही आता वाहन चालकावरच, लातूरात नवी नियामवली
ओमिक्रॅानचे सर्वाधिक रुग्न हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्याअनुशंगाने आता स्थानिक पातळीवरही प्रशासन सतर्कता बाळगत आहे. योग्य ती खबरदारी आता लातूर शहरासह ग्रामीण भागात घेतली जात असतानाच लातूर मनपाच्या वतीने एक वेगळाच नियम जारी करण्यात आला आहे. प्रवास करणऱ्या प्रवाशाला मास्क नसेल तर मात्र वाहनचालकालाही दंड आकारला जाणार आहे.
लातूर : ओमिक्रॅानचे सर्वाधिक रुग्न हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्याअनुशंगाने आता स्थानिक पातळीवरही प्रशासन सतर्कता बाळगत आहे. योग्य ती खबरदारी आता लातूर शहरासह ग्रामीण भागात घेतली जात असतानाच (Latur Municipal Corporation) लातूर मनपाच्या वतीने एक वेगळाच नियम जारी करण्यात आला आहे. प्रवास करणऱ्या प्रवाशाला मास्क नसेल तर मात्र वाहनचालकालाही दंड आकारला जाणार आहे. म्हणजेच वाहनात येणाऱ्या प्रवाश्याने मास्क घातले आहे की नाही याची जबाबदारी चालकावरच राहणार आहे. नियम वेगळा असला तरी मनपा प्रशासनाचा उद्देश चांगला असल्याने लातूरकर याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सांगून झाले, आता दंडात्मक कारवाई
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्नांची संख्या कमी असली तरी, योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. यामध्ये आता नव्या व्हेरीयंटची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही वेगवेगळे नियम लादले जात आहेत. यापूर्वी ज्यांनी एकही डोस घेतला नाही त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आले होते. शिवाय पेट्रोल-डिझेलही दिले जात नव्हते. हे सर्व करुनही प्रशासनाच्या आवहानाला प्रतिसाद मिळत नसल्याने मंगळवारपासून दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. मनपा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही कारवाई करीत आहे.
परवानाधारक वाहनांना नोटीसा
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी एक ना अनेक प्रयोग राबवले जातात. मात्र, नागरिक तेवढ्या सजगतेने राहत नसल्याने आता वेगवेगळे नियम ठरवून दिले जात नाहीत. म्हणूनच अॅटोरिक्षा, प्रवासी खासगी वाहतूक करणाऱ्या बसेस, स्कूल बस, टुरिस्ट टॅक्सी, परवानाधारक अॅटोरिक्षा या सर्वच प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांना आता प्रवाशांनी तोंडाला मास्क लावलेला आहे का? हे पाहूनच प्रवेश द्यावा लागणार आहे. अन्यथा प्रवाशाने मास्क घातलेला नसला तरी दंड हा वाहनचालकालाच भरावा लागणार आहे. त्यामुळे अधिकतर लातूरकर हे मास्क वापरतील हा त्यामागचा उद्देश आहे.
मनपा, पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे दंड आकारुन महसून गोळा करण्याचा उद्देश हा प्रशासनाचा नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कठोर निर्णय घेतले जात असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. शिवाय मंगळवारपासून नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्याला दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ज्यांनी मास्क घातलेला नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी विनामास्क असलेल्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.