…तर आमदारकीचाही राजीनामा देईन : तानाजी सावंत

पाण्याच्या बाबतीत माझ्या जिल्ह्यावर अन्याय केला, तर तो हाणून पाडेन. मग कुठला पक्ष याचा मुलाहिजा बाळगणार नाही, असा इशाराही तानाजी सावंत यांनी दिला

...तर आमदारकीचाही राजीनामा देईन : तानाजी सावंत
Follow us
| Updated on: Feb 07, 2020 | 12:54 PM

मुंबई : शिवसेना पक्षाने माझ्या आमदारकीचा, पदाचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन, पण पद सोडताना माझी एकच अट असेल, माझ्या भागाला 21 टीएमसी पाणी द्या, असं वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant on Marathwada Water Issue) यांनी केलं. शिवसेनेबाबत असलेल्या नाराजीवर तानाजी सावंत यांनी पडदा टाकला असला, तरी महाविकास आघाडी सरकारवर तानाजी सावंतांनी टीका केली.

पाण्याच्या बाबतीत त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मराठवाडा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. गेली 50 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला. आमच्या शासनाने (फडणवीस सरकार) जी वॉटरग्रीड सिस्टम मंजूर केली होती, त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याने स्थगिती देण्याचं कारस्थान केलं, असा आरोप तानाजी सावंत यांनी केला.

पाण्याच्या बाबतीत माझ्या जिल्ह्यावर अन्याय केला, तर तो हाणून पाडेन. मग कुठला पक्ष याचा मुलाहिजा बाळगणार नाही, असा इशाराही तानाजी सावंत यांनी दिला. कुठल्या पक्षाची मराठवाड्याप्रती काय भूमिका आहे, हे दोन-चार महिन्यात स्पष्ट होईल, असंही तानाजी सावंत म्हणाले.

जो या जिल्ह्याच्या विरोधात तो आपला विरोधक. मंत्रिपदाचं कवच गेलं, पण आमदार तोच आहे. आपल्याला मंत्रिपद दिलं नाही, त्यामुळे विकास होईल का, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. पण विकासाच्या आड कोणी आलं, तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी तानाजी सावंत मागे वळून पाहणार नाही, असंही तानाजी सावंतांनी निक्षून सांगितलं.

महिना-दोन महिने तुमच्या हाती अधिकार आले, म्हणून हुरळून जाऊ नका. कधी पहाटे पाच वाजता अधिकार निघून जाईल, सांगता येणार नाही, असा टोलाही सावंतांनी लगावला. केंद्राच्या मदतीशिवाय एकही प्रोजेक्ट पुढे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचंही त्यांनी बोलून (Tanaji Sawant on Marathwada Water Issue) दाखवलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.