सरकारकडून क्रूर थट्टा, नाशिक-वर्ध्यात फक्त एकाच शेतकऱ्याला नुकसान भरपाई

उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून पुन्हा एकदा क्रूर थट्टा करण्यात आली असून नाशिक व वर्धा जिल्ह्यात केवळ एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे . राज्य सरकारने एप्रिल व मे 2018 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटच्या नुकसानीचा आकडा जाहीर केला असून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली आहे . नाशिक व वर्धात प्रत्येकी […]

सरकारकडून क्रूर थट्टा, नाशिक-वर्ध्यात फक्त एकाच शेतकऱ्याला नुकसान भरपाई
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून पुन्हा एकदा क्रूर थट्टा करण्यात आली असून नाशिक व वर्धा जिल्ह्यात केवळ एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे . राज्य सरकारने एप्रिल व मे 2018 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटच्या नुकसानीचा आकडा जाहीर केला असून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली आहे . नाशिक व वर्धात प्रत्येकी एका शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा जावईशोध शासकीय यंत्रणेतील अधिकारी व सरकारने लावला आहे. नाशिक येथील एका शेतकऱ्याला त्याचे 40 गुंठे म्हणजे 1 एकर क्षेत्रात झालेल्या नुकसानी पोटी 5 हजार तर वर्धा येथील एका शेतकऱ्याला त्याचे 5 गुंठे क्षेत्रात झालेल्या नुकसानीपोटी 1 हजार नुकसान भरपाई जाहीर केली आहे . प्रत्यक्षात राज्यात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळीने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते .

राज्यातील एकूण 17 हजार 135 शेतकऱ्यांना 11 कोटी 7 लाख 99 हजार 195 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली असून 6 हजार 834 हेकटर क्षेत्रावर अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे असे सरकारचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील 25 तर मे महिन्यात राज्यातील 13 जिल्ह्यातील पिके व फळपिकांचे नुकसान झाले असून राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने 18 डिसेंबर रोजी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे .

बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रकरणी मदत अनुज्ञेय असणार आहे . पिकांच्या नुकसानीकरीता आलेली ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे .

सरकारी आकडेवारी पाहता अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिक आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याला फटका बसला असेच म्हणावे लागेल, अधिकारी व सरकारने हा निष्कर्ष कोणत्या आधारे काढला हे प्रश्नचिन्ह आहे

नुकसान भरपाईची विभागनिहाय आकडेवारी :

  • राज्यातील 17 हजार 135 शेतकऱ्यांना 11 कोटी 7 लाख 99 हजार नुकसान भरपाई
  • नागपूर विभागातील 580 शेतकऱ्यांना 238.24 हेकटर क्षेत्रासाठी 24 लाख
  • अमरावती विभागातील 856 शेतकऱ्यांना 574.66 हेकटर क्षेत्रासाठी 79 लाख 93 हजार
  • औरंगाबाद विभागातील 580 शेतकऱ्यांना 238.24 हेकटर क्षेत्रासाठी 3 कोटी 45 लाख
  • नाशिक विभागातील 1899 शेतकऱ्यांना 659.70 हेकटर क्षेत्रासाठी 97 लाख 35 हजार
  • पुणे विभागातील 4773 शेतकऱ्यांना 2101.24 हेकटर क्षेत्रासाठी 3 कोटी 52 लाख
  • कोकण विभागातील 3382 शेतकऱ्यांना 991.31 हेकटर क्षेत्रासाठी 2 कोटी 7 लाख
Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.