Bharati Pawar | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरनासृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबई : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरनासृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात येत आहे. खुद्द भारती पवार यांनी याबाबत ट्विटरव माहिती दिली आहे. विशेष म्हणजे भारती पवार यांनी कालच मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कोरोना प्रसाराबाबत आढावा बैठक घेतली होती.
आज मेरी #Covid_19 टेस्ट का रिपोर्ट POSITIVE आया है और मैने अपने आप को घर में क्वॉरंटाइन कर लिया है. मेरे संपर्क में आये व्यक्तियों से निवेदन है कि वो अपना #Covid-19 टेस्ट करवाएं और कोरोना के बचाव के नियमों का पालन करें.
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) January 6, 2022
संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करुन घ्यावी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे तसेच मुंबईसारख्या मोठ्या शहरात अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. अशा परिस्थिती देशातील नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे. मागील काही दिवसांपासून मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री यशोमती ठाकूर आदी नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी तत्काळ कोरोना प्रतिबंधक चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन भारती पवार यांनी केले आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाचा संसर्ग
दरम्यान, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. गोडसे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर सर्दी, खोकला आणि ताप आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी चाचणी केली होती. हेमंत गोडसे यांना यापूर्वी देखील कोरोना झाला होता. संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन हेमंत गोडसे यांनी केलं आहे.
इतर बातम्या :
दिवसाला 25 हजार रुग्ण आले तर काय करणार?, बेडपासून औषधांपर्यंतचा मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लान तयार
भीतीची लाटही नको, का? राज्यातली ही तुलनात्मक आकडेवारी नेमकं काय सांगते?