तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी तब्बल 249 उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघामध्ये एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी दाखल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल होती. त्यामुळे अर्ज मागे घेतल्यानंतरच्या अंतिम यादीत 249 उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. अंतिम यादीतील उमेदवारांची मतदारसंघ निहाय संख्या पुढील प्रमाणे, […]

तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी तब्बल 249 उमेदवार निवडणूक रिंगणात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघामध्ये एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी दाखल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल होती. त्यामुळे अर्ज मागे घेतल्यानंतरच्या अंतिम यादीत 249 उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. अंतिम यादीतील उमेदवारांची मतदारसंघ निहाय संख्या पुढील प्रमाणे,

जळगाव (14), रावेर (12), जालना (20), औरंगाबाद (23), रायगड (16), पुणे (31), बारामती (18), अहमदनगर (19), माढा (31), सांगली (12), सातारा (9), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15), हातकणंगले (17)

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तसेच 6, 12 आणि 19 मे अशा 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

पाहा व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.