राहुल बाळा ही इटली नाही, हा हिंदुस्थान आहे : उद्धव ठाकरे

बुलडाणा:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. राहुल बाळा ही इटली नाही हा हिंदुस्थान आहे, इथे देशद्रोह्याला जागा नाही, अशी एकेरी टीका उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर केली. ते बुलडाण्यात बोलत होते. विधानसभा निवडणुकीवेळी सेना-भाजप युती तुटली तेव्हा शरद पवार सरकारवर टीका करत […]

राहुल बाळा ही इटली नाही, हा हिंदुस्थान आहे : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

बुलडाणा:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. राहुल बाळा ही इटली नाही हा हिंदुस्थान आहे, इथे देशद्रोह्याला जागा नाही, अशी एकेरी टीका उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर केली. ते बुलडाण्यात बोलत होते.

विधानसभा निवडणुकीवेळी सेना-भाजप युती तुटली तेव्हा शरद पवार सरकारवर टीका करत होते. शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही? अशी विचारणा करत होते.  कारण आम्ही बाहेर पडल्यावर यांना भाजपसोबत युती करायची होती, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. जवळपास 25 मिनिटांच्या भाषणात त्यांनी शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, मुलायम सिंह, मायावती आदींवर टीका करत युतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

उद्धव म्हणाले “कन्हैया, दाऊदसारख्यांना वाचविण्यासाठी राहुल गांधीना देशद्रोह्याचा कायदा काढून टाकायचा आहे. मात्र देशद्रोह्याला फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधींसारख्या नेभळटाच्या हातात देश द्यायचा का? आम्ही 370 कलम काढणार असं बोलतो मात्र राहुल गांधी बोलतात की 370 कलम काढणार नाही, आम्ही बोलतो राम मंदिर बांधू, राहुल गांधींच्या जाहीरनाम्यात राम मंदिर कुठेच नाही”

जवानांना हिम्मत देण्यासाठी त्यांना हिम्मत देणारे सरकार निवडून आणण्याचे आवाहन करत, उद्धव ठाकरे यांनी मागच्या सरकारने 50 वर्षात काय केलं तुम्ही आठवा, अशी विचारणा केली.

राहुल गांधींच्या आजीने (इंदिरा गांधी) गरिबी हटावची घोषणा दिली होती. पण गांधींची गरिबी हटली आणि आमचा गरीब तसाच राहिला, असा हल्ला उद्धव ठाकरेंनी केला.

शौर्याचं राजकारण करण्याचा हक्क कुणालाही नाही. मात्र विरोधकांनी जवानांच्या शौर्याचं खच्चीकरण करू नये, असंही उद्धव म्हणाले.

मोदीजी आता पाकड्यांचे कंबरडे मोडा, उद्या आपल्यावर हल्ले करायला शिल्लक राहता कामा नयेत. शरद पवार पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील. आजपर्यंत जेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा काहीही झाले नाही. पण आता दोन वेळा पाकिस्तानवर हल्ले झालेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.