पाण्याचा वाद टोकाला, महिलांनी थेट शोले स्टाईल आंदोलनच केलं, पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि दिला इशारा
नाशिकच्या इगतपुरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून सर्वत्र ओळखले जाते, मात्र, येथील गावकऱ्यांची धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शैलेश पुरोहित, इगतपुरी (नाशिक) : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या प्रश्न काही महिन्यांपासून निकाली लागत नाही. त्यामुळे संतप्त मानवेढे आणि पंचक्रोशीतील गावकारींनी आक्रमक होऊन थेट भावली धारणावरून समृद्धीला जाणारे पाणी आणि इतर ठिकाणी जाणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावरून स्थानिक महिला चांगल्याच आक्रमक झाल्या असून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनही गावकऱ्यांनी केलं आहे. जो पर्यन्त शहराला पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे. इगतपुरी, घोटी, शहापूर आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी भावली धरणाचे पाणी देण्यात आले आहे. मात्र तहाणलेल्या गावांना पाणी न दिल्याने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. ग्रामपंचायत पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाल्याने ऐन थंडीत प्रशासनाला घाम फुटला आहे. जलजीवन योजने अंतर्गत मानवेढे येथे पाणीपुरवठा योजनेचे काम बंद आहे. त्यामुळे मानवेढे आणि जांभचीवाडीसह परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून सर्वत्र ओळखले जाते, मात्र, येथील गावकऱ्यांची धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मानवेढे गावासह पंचक्रोशीत पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी थेट भावली धरण गाठून इगतपुरी तालुक्यातील शहारासह समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे पाणी गावकऱ्यांनी बंद करून टाकले आहे.
गावात असलेल्या पंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून महिलांसह पुढाऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यन्त गावाला पाणी सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
धरणांचा तालुका म्हणून सर्वत्र ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील गावांनाच पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याने गावकऱ्यांचा दिवसेंदिवस संताप व्यक्त होत आहे.