बारामतीच्या जनतेने आशीर्वाद दिलाय, माझा विजय निश्चित : कांचन कुल

बारामती : एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर विरोधी पक्षांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रातही अनेक प्रतिष्ठेच्या लढती आहेत. भाजपने बारामतीमध्ये विजयाचा दावा केलाय. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती. प्रत्येकजण स्वतः उमेदवार असल्याप्रमाणेच काम करत होता. एकूणच जनतेनेच आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजप उमेदवार कांचन कुल यांनी […]

बारामतीच्या जनतेने आशीर्वाद दिलाय, माझा विजय निश्चित : कांचन कुल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

बारामती : एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर विरोधी पक्षांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रातही अनेक प्रतिष्ठेच्या लढती आहेत. भाजपने बारामतीमध्ये विजयाचा दावा केलाय. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती. प्रत्येकजण स्वतः उमेदवार असल्याप्रमाणेच काम करत होता. एकूणच जनतेनेच आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजप उमेदवार कांचन कुल यांनी व्यक्त केला.

विरोधी उमेदवार आम्हीच जिंकणार असं आत्मविश्वासाने सांगतात. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ईव्हीएमवर अविश्वास दाखवतात ही विचार करण्यासारखी बाब असल्याचा टोला लगावत, आता कुठे गेला विरोधी उमेदवारांचा आत्मविश्वास असा सवालही कांचन कुल यांनी उपस्थित केला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांनी आज बारामतीतील सिद्धेश्वर मंदिरात जाऊन सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याला सिद्धेश्वराकडून कौल मिळालाय आणि जनताही आपल्या पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलं.

विरोधी उमेदवार विजय निश्चित असल्याचं सांगतात. त्याचवेळी शरद पवार हे ईव्हीएमवर अविश्वास दाखवतात. त्यावरुनच विरोधी उमेदवारांचा आत्मविश्वास काय तो कळतो असंही कांचन कुल म्हणाल्या. ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. पण जनतेने पाठबळ दिल्याने आम्हीच विजयी होऊ, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीच्या जिरायत भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांचा समावेश असलेली समिती नेमून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे येथील जनतेचा पाण्याचा प्रश्न आम्हीच सोडवू शकतो, असंही कांचन कुल यांनी सांगितलं. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. त्यामुळे आतापासूनच आम्ही जनतेची प्रश्न समजावून घेऊन कामाला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या भागातील लोकांचे प्रश्न आम्ही समजावून घेत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.