मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार : अभिजीत पानसे

"हिंदू सणांवर जेव्हा जेव्हा संक्रांत आली तेव्हा मनसे उभी राहिली. दहिहंडीवर बंदी आली, गणेश मंडपांवर बंदी आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बंदी घालूनसुद्धा एकमेव माणूस उभा राहिला तो म्हणजे राज ठाकरे", असं मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले (Abhijit Panse on MNS Maha Morcha).

मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार : अभिजीत पानसे
Follow us
| Updated on: Feb 09, 2020 | 6:40 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण झालं. आता या मोर्चानंतर राज ठाकरेचं पुढचं धोरण काय असणार? याबाबत मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे (Abhijit Panse on MNS Maha Morcha). मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती पानसे यांनी दिली.

“आजच्या मोर्चानंतर याच आठवड्यात राज ठाकरे महाराष्ट्राच्या विविध भागांचा दौरा करतील. हे भगवं वादळ फक्त मुंबईपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात सुरु झालं आहे. अनेकजण मनसेत प्रवेशासाठी इच्छूक आहेत. मोठमोठ्या नेत्यांचा मनसेत प्रवेश होत आहे. त्यामुळे आता महराष्ट्राचं नेतृत्व राज ठाकरेंच्या हातात असेल”, असा दावा अभिजीत पानसे (Abhijit Panse on MNS Maha Morcha) यांनी केला.

“मोर्चाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. लोकं हिंदू जीमखान्यापासून आझाद मैदानापर्यंत चालत आले. हा प्रतिसाद राज ठाकरे यांच्या भूमिकेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत”, असंदेखील अभिजीत पानसे म्हणाले.

‘घुसखोरांना हाकलायलाच हवं’

“केवळ झेंडा बदलला म्हणून आम्ही हिंदूत्त्व झालो हे चुकीचं आहे. हिंदूत्व आमचा अजेंडा नव्हता, अशातला काही भाग नाही. हिंदू सणांवर जेव्हा जेव्हा संक्रांत आली तेव्हा मनसे उभी राहिली. दहिहंडीवर बंदी आली, गणेश मंडपांवर बंदी आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बंदी घालूनसुद्धा एकमेव माणूस उभा राहिला तो म्हणजे राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार दहिहंडी उत्सव साजरा केला. झेंडा बदलला म्हणून भूमिका बदलली नाही. आजची जी भूमिका आहे ती पक्षाच्या आणि राजकारणापलीकडची भूमिका आहे. आज या देशात अनधिकृत पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर राहत असतील तर त्यांना हाकलायलाच हवं”, असं अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.