…तर पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती : आव्हाड

मुंबई : काँग्रेसने 60 वर्षात देशासाठी मिराज, मिग, सुखोई घेऊन ठेवली नसती, तर आज पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने मिराज, मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी […]

...तर पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती : आव्हाड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : काँग्रेसने 60 वर्षात देशासाठी मिराज, मिग, सुखोई घेऊन ठेवली नसती, तर आज पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने मिराज, मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

” काँग्रेसने 60 वर्षात देशासाठी मिराज, मिग, सुखोई घेऊन ठेवली नसती, तर आज पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती”, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आयईडी स्फोट घडवला आणि यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 26 फेब्रुवारीच्या पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानात घुसून, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर 1000 किलोंचा बॉम्ब टाकला आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना मिराज, मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला. ही लढाऊ विमानं काँग्रेस सरकारच्या काळात खरेदी करण्यात आली होती. त्या गोष्टीचा आधार घेत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, चावताळलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत 10 किलोमीटरपर्यंत 20 विमानं घुसवली होती. मात्र, भारताने पाकिस्तानला पुन्हा प्रत्युत्तर देत, सर्व विमानं माघारी धाडली.

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.