ठाकरे सरकारचा फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे मोर्चा, 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने देवेंद्र फडणवीसांच्या काळातील प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता आपला मोर्चा फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे वळवला आहे.

ठाकरे सरकारचा फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे मोर्चा, 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या
Follow us
| Updated on: Dec 06, 2019 | 3:27 PM

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने देवेंद्र फडणवीसांच्या काळातील प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता आपला मोर्चा फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. ठाकरे सरकारने तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची बदली म्हणजे मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी (Ashwini Joshi, BMC transferred) यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अधिकाऱ्यांच्या बदलीला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. (Ashwini Joshi, BMC transferred)

अश्विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियानात प्रकल्प संचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर अश्विनी जोशींच्या जागी एस. एम. काकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सहआयुक्त सुमन चंद्रा यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांच्याविरोधात अविश्वास आणण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा होता. ‘आपली चिकीत्सा’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा शिवसेनेचा दावा होता. या योजनेच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी शिवसेनेनं लावून धरली होती. पण जोशी यांनी ठेकेदाराला एक संधी देण्याची भूमिका घेतली होती.

अश्विनी जोशी यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य, घनकचरा विभागाची जबाबदारी होती. अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महापालिका मुख्यलयात समन्वय समित्यांची एकत्रित बैठक घेऊन अवघे 24 तास उलटत नाहीत, तोपर्यंत जोशी यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांची राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानात प्रकल्प संचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर महापालिकेत जोशी यांच्या पदावर एस. एम. काकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील मुंबई महापालिकेतील अनेक प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रडारवर आहेत.  अश्विनी जोशी यांच्या तडकाफडकी बदलीतून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मालिका सुरु झाली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.