मुंबईकर कष्टाळू! सुट्टी न घेता काम करण्यात नंबर वन

मुंबई : दिवस-रात्र धावणाऱ्या शहरांमध्ये मुंबई शहराचं नाव आवर्जून घेतलं जातं. आता याच धावत्या मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य समोर आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर कामात इतके व्यस्त असतात की, वर्षभरात फार कमी वेळा सुट्टीवर जातात. त्यामुळे मुंबई कधीही थांबत नाही, ती घड्याळाच्या काट्यानुसार चालते. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. एका ट्रॅव्हल वेबसाईटने केलेल्या […]

मुंबईकर कष्टाळू! सुट्टी न घेता काम करण्यात नंबर वन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : दिवस-रात्र धावणाऱ्या शहरांमध्ये मुंबई शहराचं नाव आवर्जून घेतलं जातं. आता याच धावत्या मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य समोर आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर कामात इतके व्यस्त असतात की, वर्षभरात फार कमी वेळा सुट्टीवर जातात. त्यामुळे मुंबई कधीही थांबत नाही, ती घड्याळाच्या काट्यानुसार चालते. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

एका ट्रॅव्हल वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील 51 टक्के लोक कामातून सुट्टीच घेत नाही. कारण त्यांना ऑफिसच्या कामातून वेळ मिळत नसल्याचं कारण समोर आलं आहे. तर 40 टक्के मुंबईकरांना सुट्ट्या मिळत असतानाही ते सुट्ट्या घेत नाहीत. कारण सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना पैसे कमावण्यात अधिक रस आहे. तर 27 टक्के मुंबईकर असे आहेत की, ज्यांनी गेल्या वर्षी (2017) ऑफिसला दांडीच मारलेली नाही.

या वेबसाईटने पुढे दिलेल्या सर्वेक्षणानुसार, 44 टक्के मुंबईकर असे आहेत, ज्यांनी गेल्यावर्षी 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेतल्या आहेत. तसेच मुंबईनंतर वर्षभरात 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेणाऱ्यांमध्ये दिल्लीचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी 43 टक्के दिल्लीकर दहापेक्षा कमी दिवस सुट्टीवर गेले होते.

मुंबईत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचे असते. त्यामुळे वारंवार सुट्टया घेतल्याने आपण अपयशी ठरु, अशीही भावना मुंबईकरांच्या मनात असल्याचे या सर्वेक्षणाच्या निरीक्षणात मांडण्यात आली आहे. एकंदरीत मेट्रो सिटी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या आणि कधीही न थांबा केवळ धावत राहणाऱ्या मुंबईत अविरत काम करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही, हेच या ट्रॅव्हल वेबसाईटच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.