मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा

मुंबई-बंगळुरु महामार्गावर आज (7 जून) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा
Follow us
| Updated on: Jul 07, 2019 | 9:00 AM

मुंबई : मुंबई-बंगळुरु महामार्गावर आज (7 जून) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. पराग हेरगावकर, राजेंद्र मांजरे आणि अभिषेक शर्मा अशी अपघातात मृत झालेल्यांची नावं आहेत.

मुंबई-बंगळुरु महामार्गावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट कार (MH 12 EM 7944) भरधाव वेगाने जात होती. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला (GJ 31 T2614) स्विफ्ट कारने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातात कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

धडक एवढी जोरदार होती की तिघांचेही मृतदेह छिन्न विछीन्न अवस्थेत कारमध्ये आढळून आले. या अपघातात जखमी असलेल्या एकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र धुके पसरलेले आहेत. अशामध्ये अपघात होण्याची शक्यता असते. आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघातात महामार्गावर झालेले आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांनीही गाड्या हळू चालवण्याचे आवाहन सर्वांना  केले आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.