ठाणे पालिका आयुक्त ‘मातोश्री’ दरबारी, महापौरांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याची विनंती

ठाण्याच्या महापौर आणि महापालिका आयुक्तांमधला (Sanjeev Jaiswal at Matoshree) वाद आता थेट 'मातोश्री' दरबारी पोहोचला आहे. ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

ठाणे पालिका आयुक्त 'मातोश्री' दरबारी, महापौरांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याची विनंती
Follow us
| Updated on: Sep 10, 2019 | 3:27 PM

मुंबई : ठाण्याच्या महापौर आणि महापालिका आयुक्तांमधला (Sanjeev Jaiswal at Matoshree) वाद आता थेट ‘मातोश्री’ दरबारी पोहोचला. ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal at Matoshree) यांनी वादावर पडदा टाकण्याची विनंती केली.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, सभापती नरेश म्हस्के, स्थायी समिती अध्यक्षांची तातडीने बैठक बोलावली. संजीव जयस्वाल निघून गेले. पण ठाण्यातील शिवसेनेचे सर्व नेते ‘मातोश्री’वर असून, उद्धव ठाकरेंनी त्यांची बैठक घेतली.

आयुक्त आणि महापौर यांच्यात महासभेतील प्रस्तावावरून मोठा वाद झाला होता. त्यात आयुक्तांनी पत्र लिहून माझ्यावर अविश्वास ठराव आणा अशी मागणी केली होती. तर महापौर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करून आयुक्तांवर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळेच आता हा वाद वाढणार की ‘मातोश्री’वर याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीने वाद मिटला

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने ठाणे आयुक्त आणि महापौर यांच्यातला वाद मिटला, अशी माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

“ठाणे आयुक्त तीन चार दिवसांपूर्वी उद्धव साहेबांना भेटले होते. वाद वाढू नये ही विनंती केली होती. आज उद्धव ठाकरेंनी सर्वांना बोलवले होते. समोरासमोर बसवून जे काही समज गैरसमज होते ते दूर केले. अविश्वासाचे पत्र आयुक्तांना मागे घ्यायला सांगितले आणि विषय संपवण्यास सांगितले. महापौरांनी मुख्यमंत्र्याना जे पत्र लिहले होते ते सभागृहात आयुक्तांची उपस्थिती असावी याबाबत ते पत्र होते. शहराच्या विकास डोळ्यापुढे ठेऊन एकत्र काम करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मीनाक्षी शिंदे, ठाणे महापौर यांची प्रतिक्रिया

“आमच्याकडून कोणता वाद नव्हता, आयुक्तांनी सुरुवात केली होती. त्यांनी ‘मातोश्री’वर येऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. अविश्वासचे पत्र मागे घेतो असं ते म्हणाले. मी मुख्यमंत्र्याना पत्र दिलं होते ते परत घेणार नाही. कारण वाद त्यांनी सुरु केला होता. आम्ही फक्त आयुक्तांनी हजर रहावे अशा सूचना केल्या होत्या. कारण ते महासभेत वारंवार गैरहजर राहात होते. ठाणे शहराच्या विकासासाठी कितीही वाद असले तरी एकत्र कामाला लागतो. आतापण आम्ही पूर्वी जसे एकत्र काम करत होतो तसेच काम करू. वैयक्तिक वादाचा ठाण्याच्या विकासावर काही परिणाम होऊ नये या मतांचे आम्ही आहोत”, असं ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.